महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी राजकीय

मराठा आरक्षण हा विषय संसदेच्या विशेष अधिवेशनात घ्या- विद्या चव्हाण

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई / प्रतिनिधी – राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलने उपोषणे सुरू आहे. राज्य सरकारने केंद्राकडे मागणी करून 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या विशेष अधिवेशनात 50% ची मर्यादा वाढवून द्यावी जेणेकरून मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होईल. देशातील इतर 8 राज्यांमध्ये देखील 50% अट ही सुप्रीम कोर्टाने (इंदिरा सहानी) काढून दिलेल्या अटीमुळे आरक्षण देण्यास अडथळा येत आहे. मोदी है तो मुमकिन है म्हणणाऱ्या भाजपला आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही आता हे संसदेत करून घेणार का? असा प्रश्न देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे

भाजप केवळ मताच्या राजकारणाकरिता जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत असते भाजप नेत्यांना जर मराठा समाजाला खरंच आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी संसदेचे होणारे विशेष अधिवेशनात हा मुद्दा मार्गी लावावा. ओबीसी, मराठा असं भांडण लावण्याचं काम सरकार आरक्षणाच्या माध्यमातून करत आहे.धनगरा चे आरक्षण हे केंद्रामध्ये “धनगड”हे म्हटल्यामुळे थांबलेले आहे . त्यासाठी सुधारणा करून घेण्याचे काम या विशेष अधिवेशनात करून घेण्याचे आवश्यक आहे. आरक्षणाचा मुद्दा धरून भाजप केवळ राजकारण करू पाहत आहे असेही विद्या चव्हाण यांनी बोलताना म्हटले आहे.

विद्याताई चव्हाण पुढे म्हणाल्या की आझाद मैदानात सुद्धा लोक उपोषणाला बसलेले आहेत. तिथे उपोषणाला बसलेल्या आंदोलकांना 4 दिवसात सरकारने भेट सुद्धा दिलेली नाही. आझाद मैदान ते मंत्रालय हे हाकेच्या अंतरावर आहे. मात्र कोणीही साधी दखल सुद्धा घेत नाही तरुण मंडळींचे उपोषण सरकारने सोडवण हे गरजेचं आहे. पण राज्य सरकारला सर्वसामान्य जनतेचे काहीही देणंघेणं नाही आहे. सरकार केवळ समाजा समाजात जातीय तेढ निर्माण करत आहेत असे विद्या चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »