महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र

वीज बिलाच्या सरकारी लूटी विरोधात वंचितला यश, विद्युत आयोगाचा दिलासादायक निर्णय

प्रतिनिधी.

मुंबई – लॉकडाऊनच्या कालावधीनंतर मीटर रिडींग न घेता सरसकट तीन महिन्याच्या वीजबिलात अव्वाच्या सव्वा युनिट आकारून वीजग्राहकांची लूट करण्यात येत होती. या विरोधात वंचित बहूजन आघाडीने २४ तारखेला राज्य विद्युत नियामक आयोगाकडे तक्रार नोंदविली होती. त्यावर राज्य वीज नियामक आयोगाने सरासरी वीज बिल रद्द करून दरमहा बिल भरण्याचे तसेच ग्राहकांचे समाधान झाल्या शिवाय वीज पुरवठा खंडित करू नये असा दिलासादायक निर्णय दिला. त्यामुळे वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून पक्षाच्यावतीने आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करीत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत मार्चनंतर थेट जूनमध्ये मीटर रिडींग घेऊन तीन महिन्यांचे एकत्रित बिल ग्राहकांना देण्यात आले. मात्र बिल देतांना वीज वापरापेक्षा अधिक देयकाचे बिल देऊन ग्राहकांची प्रचंड लुट करण्यात आली. हे बिल आकारताना एकूण तीन महिन्याचे बिल एकत्र केल्याने युनिट पाचशेच्यावर गेले. त्यामुळे वीज बिल जवळ जवळ चौपाटीने वाढले. हा ग्राहकाच्या खिश्यावर टाकलेला सरकारी दरोडा असल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडी तसेच अनेक ग्राहकांनी महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात २४ जून रोजी राज्य विद्युत नियामक आयोगाकडे तक्रारी दाखल केल्या. स्लॅब बेनिफिट न देता ग्राहकांना एप्रिल व मे मध्ये सरासरी वीजबिलांची रक्कम दिली गेली. त्या रकमेचे समायोजन तसेच चुकीच्या बिलाच्या दुरुस्तीची तत्परतेने निर्णय घेण्यात आले नाही. त्यामुळे अवाजवी वीज बिलाचा भरणा ग्राहकांना करावा लागेलं शिवाय सोबतच बिल कमी करण्यासाठी किंवा दुरुस्त्यासाठी वीज कार्यालयाच्या फे-या माराव्या लागतील.

दरम्यान महावितरणच्या ग्राहकांवर वीजबिलांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा भुर्दंड लादलेला नाही तसेच जूनमध्ये देण्यात येत असलेली वीज बिले ही लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी वापरलेल्या सरासरी युनिट प्रमाणे दिली असल्याचे उर्जामंत्र्यांनी सांगितले. मात्र विजबिलाची रक्कम पाहता ही सरकारी लूट असल्याने ग्राहकांनी अवास्तव वीज बिलाचा भरणा करू नये तसेच राज्य विद्युत नियामक आयोगाने विज ग्राहकांची लुट थांबवावी अशी मागणी करण्यात आली होती. सरासरी बिल न घेता दरमहा बिल (तीन स्वतंत्र बिल) घेऊनच बिलाचा भरणा करावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले होते. नियामक आयोगाने या तक्रारींची दखल घेऊन सरासरी ऐवजी दरमहा वीज बिल भरणा करून घेण्याचे तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे समाधान होई पर्यंत वीज पुरवठा खंडित करू नये असा निर्णय दिला. त्यामुळे ग्राहकांची या सरकारी लुटी पासून सुटका झाली आहे. ग्राहकांनी अव्वाच्या सव्वा बिल न भरता वीज वापरा प्रमाणे बिल भरावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.

Related Posts
Translate »