महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

निवडणूक आयोगाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा वंचित बहुजन आघाडी इशारा

नेशन न्यूज मराठी टिम.

https://youtu.be/gFpMiC55k7Y

कल्याण/प्रतिनिधी – ठाणे जिल्हा महिला आघाडी तर्फे कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडांगण कल्याण येथे भव्य निर्धार सभा आयोजित करण्यात आली होती . या निर्धार सभेच्या उद्घाटक आदरणीय अंजलीताई आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ताई ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कल्याण मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या निर्धार सभेत रेखाताई ठाकूर यांनी भाजपवर सडकून टीका केली.

पुणे पोट निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही भाजपला मदत करत असल्याची टीका रोहित पवार यांनी केली होती. यावर बोलताना वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी संगितले की ही त्यांची जुनी टीका आहे. भाजपला मदत हे त्यांचे काकाच करतात त्यांनी भाजप सोबत किती युत्या केल्या कसे शपथविधी केल्या आणि आता नागालँड मध्ये हे पुढे आले असताना आमच्या वरती परत तेच आरोप करत राहणार याला काही अर्थ नाही.

हा पॉलिटिकल अजेंडा आहे मात्र वस्तू स्थिती समोर आली आहे. महाविकास आघाडी बरोबर आमचा समझोता नाही आमचा समझोता शिवसेने बरोबर आहे. जागा वाटप विषयी वंचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर यांना विचारणा केली असता त्या ही महाविकास आघाडी बरोबर आमचा समझोता झालेला नाही आमचा समझोता हा शिवसेनेबरोबर झालेला आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे हे जागावाटप आहे. अशी महिती ही रेखा ठाक़ूर यांनी दिली.

महानगरपालिकेच्या निवडणूक बाबत एका ठाकूर यांना विचारले असता पालिकेच्या निवडणुका सातत्याने लांबवल्या जात असून या विरोधात निवडणूक आयोगा विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. निवडणूक आयोगाला अशा पद्धतीने वागण्याचा कोणताही अधिकार नाही जर ते संविधानाचे पालन करणार नसतील तर त्यांना आता जनतेने धडा शिकवण्याची गरज आहे आहे. आज चाललेले राजकारण लोकांच्या हिताचे नाही हे त्यांना ठणकावून सांगण्याची गरज आहे म्हणूनच आपण रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दंगे करायचे भावना भडकवायच्या आणि समाजामध्ये धार्मिक दुर्विकरण घडवून आणायचं आणि त्याच्या आधारावरती निवडणुका जिंकायच्या हे त्यांचं मॉडेल आहे आणि त्या मॉडेल नुसार हा सर्व कार्यक्रम चालू आहे आणि म्हणून आज या ठिकाणी जो काही अक्रोश केला जातो आहे हा आक्रोश या राजकारणासाठी केला जातो आहे त्याच्या मध्ये हिंदूंच्या हिताचा कोणताही विषय नाही तर तो जर असता तर मग त्यांनी या ठिकाणी ओबीसींचे जे आज हिंदू ओबीसींचे राजकीय आरक्षण गेलेला आहे ते आरक्षण वाचवण्यासाठी त्यांनी डेटा दिला असता त्यांच्याकडे असलेला डेटा त्यास द्यायला मागत नाहीत ओबीसी हिंदू नाहीत का? ओबीसी आहेत तुम्ही जर हिंदूंच्यासाठी लढता तर मग हे हेच हिंदू नाहीत का? त्या हिंदूंच्यासाठी तुम्ही काही करणार नाही आणि उगाच या ठिकाणी नको त्या अफ़वा उठवायच्या आणि या ठिकाणी भावना भडकवून लोकांचं रक्त सांडायचं हे जे राजकारण आहे हे राजकारण आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही अशी टिका ही ठाकुर यांनी विरोधकांवर केली.

मागच्या वेळेस ज्या वेळेस राज ठाकरेंनी हा विषय उठवला होता हनुमान चालीसाचा त्यावेळेस सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व शहरांमध्ये शांतता मार्च काढून आम्ही त्या ठिकाणी दंगा होऊ देणार नाही भावना भडकवू दिला जाणार नाही चालीसा म्हणायची असेल तर तुम्ही मैदानात म्हणा मशिदीच्या समोर आम्ही म्हणू देणार नाही ही ठाम भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आणि त्यावेळेस त्यांचं संपूर्ण जो काही अजेंडा होता तो आम्ही फेल केला. असे ही त्यानी संगितले.

आता देखील यापुढे जर का ते या पद्धतीने करणार असतील तर महाराष्ट्र मधल्या वंचित बहुजनांना या ठिकाणी हे सूडबुद्धीचं आणि रक्तपाताचा आणि हिंसेच राजकारणामध्ये वापरता येणार नाही याच्यासाठी आम्ही पुरेपूर काळजी घेऊ.असेही यावेळी त्या म्हणाल्या.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »