महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी मुंबई

‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानात आयटीआय विद्यार्थ्यांचा सहभाग

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – शहराला स्वच्छ आणि आरोग्यदायी बनविण्याच्या उद्देशाने सध्या राबविण्यात येत असलेल्या ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानात मुंबईतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले. त्याचबरोबर या अभियानाबाबत जनजागृती करून अभियानात मुंबईकरांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेत आपल्या संस्थेबरोबरच शहराला स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केला.

राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रदीप दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली उपनगरातील आयटीआयनी या अभियानात सहभाग घेतला.

अभियानाअंतर्गत 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत नवीन वर्षारंभापुर्वी मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ असावीत या उद्देशाने  मुलुंड, कुर्ला, गोवंडी, अंधेरी, बोरिवली व चांदिवली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून उत्साहात हा उपक्रम राबविण्यात आला. या संस्थांनी आपल्या आयटीआय परिसराबरोबरच मुलुंड, नाहूर, विद्याविहार, बोरिवली, खार व कुर्ला रेल्वे स्थानकांवर स्वच्छता केली. संस्थांचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी व प्रशिक्षणार्थ्यांनी “स्वच्छता प्रतिज्ञा” घेतली. कार्यक्रमासाठी त्या त्या वॉर्डचे महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुंबई उपनगरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य संजय गोरे (मुलुंड), उपप्राचार्य संदिप परदेशी (मुलुंड), श्रीमती पाटिल (कुर्ला गोवंडी), कमलेश केळबाईकर (बोरीवली), शरद गोतपगार (अंधेरी), एस. व्ही. पाटील (चांदिवली) यांनी उपक्रमाचे नियोजन केले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »