नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाने दिली. निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दि. १ डिसेंबर रोजी पत्र निर्गमित केले आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविणयात आले आहेत. ३० नोव्हेंबरपासून आयोगाची वेबसाइट अतिशय मंदगतीने सुरु असल्याने उमेदवारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उमेदवार अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगातर्फे तातडीने दखल घेतली गेली व सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
Related Posts