नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत उघडकीस आलेला महारेरा सर्टिफिकेट घोटाळा आता चांगलाच चर्चेत आला आहे.यामध्ये उद्योजकांसह भूमालकांची चौकशी एसआयटी मार्फत सुरू आहे. मात्र या प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात बांधकामे झाली आहेत. त्यांना देखील दोषी ठरवून त्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे केली आहे. या संदर्भात राज्याचे उप मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील आमदार प्रमोद(राजू)पाटील यांनी दिले होते.
राज्यातील पहिला महारेरा सर्टीफिकेट घोटाळा कल्याण डोंबिवलीत समोर आलाय. या घोटाळ्यात आता पर्यंत ६५ बिल्डरांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर यांत ५ जणांना अटक झाली. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढणार असं मत आता तपास यंत्रणांचे झाले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास हा एसआयटी मार्फत सुरू आहे. मात्र हि बांधकामे एका दिवसात झालेली नाहीत. त्यामुळे ज्या बांधकामांना भू-मालक आणि बिल्डर जेवढे जबाबदार आहेत तेवढेच अधिकारी देखील आहेत.कारण एका दिवसात हि बांधकामी झालेली नाहीत. महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दोषी ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची देखील चौकशी करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी जिल्हा नियोजन समिती कडे केली आहे. आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना कालीन लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,आमदार गीता जैन,संजय केळकर यांसह उपस्थित आमदार खासदारांनी देखील पाठिंबा दिलाय.
वारंवार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनधिकृत बांधकामांचा विषय येऊन सुद्धा योग्य कारवाई होत नसल्याने आमदार हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आक्रमक झाले होते. त्यामुळे आता पालकमंत्री या प्रकरणी अधिकाऱ्यांच्या मागे देखील चौकशीचा फेरा लावणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमदार राजू पाटील यांच्या या मागणीवर पालकमंत्री संभूराजे देसाई यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तर आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केलेली मागण्यांवर कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद उपस्थित केलेल्या मुद्यांवरून आमदार राजू पाटील यांचे खासदार शिंदे यांनी देखील कौतुक केलंय. तर कल्याण डोंबिवली मधील विकासकामांसाठी एकजुटीने काम करण्याचे आश्वासन खासदार शिंदे यांनी आमदार पाटील यांना दिले.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावातील सफाई कामगार हे गावात स्वच्छतेची काम करत आहेत.मात्र हि काम करणाऱ्या ४९९ कामगारांना तातडीने शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
मध्य रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या महापालिकांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचे बस्तान आहे. रेल्वे स्थानक परिसरात प्रवाश्यांना रस्त्याने चालणं देखील कठीण झालं आहे. त्यामुळे कारवाई करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची उपलब्धता करून तातडीनं रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्याच्या करण्यात याव्यात. आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उपस्थित आमदारांनी देखील सकारत्मक प्रतिसद देत तातडीने कारवाई मागणी करण्यात आली आहे. नुकताच मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे मनपा प्रशासनाला पत्र देत दिव्यातील रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाला मुक्त करण्याची मागणी केली होती. मात्र पत्र दिली नंतर तीन तासाच्या कालावधीत पुन्हा फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडलेले दिसून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या आशीर्वादाने फेरीवाले येत असल्याने ज्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या परिसरात फेरीवाले बस्तान मांडत आहेत. त्यांच्यावर देखील तातडीने कारवाई करून प्रवाश्यांना होणाऱ्या जाचातून सुटका करावी अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
कोणत्याही प्रकारची केडीएमसीची सुविधा न घेणाऱ्या पलावा सिटी मधील राहिवाश्यांकडून मोठ्या प्रमाणात कर आकारणी महापालिका करत आहे.नागरिकांनी कर देखील भरलेला आहे.यामध्ये महापालिकेवर नागरिकांचे १५ कोटी पेक्षा अधिक पैसे जमा अधिकचे आहेत.त्यामुळे नागरिकांनी १५ कोटी रुपयांच्या अधिकच्या दिलेल्या पैशांची व्याजासहित पैसे मागतील त्यापेक्षा लवकरच निर्णय घ्या अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विषय घेतला.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावांमध्ये केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. गावागावात सध्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तर पाण्यामुळेअनेकांचे जीव देखील गेले आहेत. मात्र या योजनेचे हे काम कासवगतीने सुरू असल्याने त्याचे काम जलदगतीने करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केलीय.या मागणीला तातडीने पालकमंत्री शंभुराजे देसाई यांनी योग्य प्रतिसाद देत मंत्रालयीन दालनात तातडीने बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे.