महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

२७ गावातील रेरा फसवणूक प्रकरणात अधिकाऱ्यांना देखील दोषी धरा -आ.राजू पाटील

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत उघडकीस आलेला महारेरा सर्टिफिकेट घोटाळा आता चांगलाच चर्चेत आला आहे.यामध्ये उद्योजकांसह भूमालकांची चौकशी एसआयटी मार्फत सुरू आहे. मात्र या प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात बांधकामे झाली आहेत. त्यांना देखील दोषी ठरवून त्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे केली आहे. या संदर्भात राज्याचे उप मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील आमदार प्रमोद(राजू)पाटील यांनी दिले होते.   

राज्यातील पहिला महारेरा सर्टीफिकेट घोटाळा कल्याण डोंबिवलीत समोर आलाय. या घोटाळ्यात आता पर्यंत ६५ बिल्डरांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर यांत ५ जणांना अटक झाली. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढणार असं मत आता तपास यंत्रणांचे झाले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास हा एसआयटी मार्फत सुरू आहे. मात्र हि बांधकामे एका दिवसात झालेली नाहीत. त्यामुळे ज्या बांधकामांना भू-मालक आणि बिल्डर जेवढे जबाबदार आहेत तेवढेच अधिकारी देखील आहेत.कारण एका दिवसात हि बांधकामी झालेली नाहीत. महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दोषी ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची देखील चौकशी करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी जिल्हा नियोजन समिती कडे केली आहे. आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना कालीन लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,आमदार गीता जैन,संजय केळकर यांसह उपस्थित आमदार खासदारांनी देखील पाठिंबा दिलाय.

वारंवार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनधिकृत बांधकामांचा विषय येऊन सुद्धा योग्य कारवाई होत नसल्याने आमदार हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आक्रमक झाले होते. त्यामुळे आता पालकमंत्री या प्रकरणी अधिकाऱ्यांच्या मागे देखील चौकशीचा फेरा लावणार का ?  हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमदार राजू पाटील यांच्या या मागणीवर पालकमंत्री संभूराजे देसाई यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तर आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केलेली मागण्यांवर कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद उपस्थित केलेल्या मुद्यांवरून आमदार राजू पाटील यांचे खासदार शिंदे यांनी देखील कौतुक केलंय. तर कल्याण डोंबिवली मधील विकासकामांसाठी एकजुटीने काम करण्याचे आश्वासन खासदार शिंदे यांनी आमदार पाटील यांना दिले.    

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावातील सफाई कामगार हे गावात स्वच्छतेची काम करत आहेत.मात्र हि काम करणाऱ्या ४९९ कामगारांना तातडीने शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

मध्य रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या महापालिकांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचे बस्तान आहे. रेल्वे स्थानक परिसरात प्रवाश्यांना रस्त्याने चालणं देखील कठीण झालं आहे. त्यामुळे कारवाई करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची उपलब्धता करून तातडीनं रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्याच्या करण्यात याव्यात. आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उपस्थित आमदारांनी देखील सकारत्मक प्रतिसद देत तातडीने कारवाई मागणी करण्यात आली आहे. नुकताच मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे मनपा प्रशासनाला पत्र देत दिव्यातील रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाला मुक्त करण्याची मागणी केली होती. मात्र पत्र दिली नंतर तीन तासाच्या कालावधीत पुन्हा फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडलेले दिसून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या आशीर्वादाने फेरीवाले येत असल्याने ज्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या परिसरात फेरीवाले बस्तान मांडत आहेत. त्यांच्यावर देखील तातडीने कारवाई करून प्रवाश्यांना होणाऱ्या जाचातून सुटका करावी अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

कोणत्याही प्रकारची केडीएमसीची सुविधा न घेणाऱ्या पलावा सिटी मधील राहिवाश्यांकडून मोठ्या प्रमाणात कर आकारणी महापालिका करत आहे.नागरिकांनी कर देखील भरलेला आहे.यामध्ये महापालिकेवर नागरिकांचे १५ कोटी पेक्षा अधिक पैसे जमा अधिकचे आहेत.त्यामुळे नागरिकांनी १५ कोटी रुपयांच्या अधिकच्या दिलेल्या पैशांची व्याजासहित पैसे मागतील त्यापेक्षा लवकरच निर्णय घ्या अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विषय घेतला.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावांमध्ये केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. गावागावात सध्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तर पाण्यामुळेअनेकांचे जीव देखील गेले आहेत. मात्र या योजनेचे हे काम कासवगतीने सुरू असल्याने त्याचे काम जलदगतीने करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केलीय.या मागणीला तातडीने पालकमंत्री शंभुराजे देसाई यांनी योग्य प्रतिसाद देत मंत्रालयीन दालनात तातडीने बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे.   

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »