महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image इतर मुख्य बातम्या

मुंबई ते पंढरपूर रेल्वेसेवा दररोज सुरु करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना साकडे

नेशन न्यूज मराठी टीम .

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – श्री क्षेत्र पंढरपूर येथे जनतेला व भाविकांना ये जा करण्यासाठी दररोज, नित्यनियमाने मुंबई ते पंढरपूर रेल्वे सेवा चालू करून तिचे थांबे वाढविण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे कल्याण पश्चिम उपाध्यक्ष सुधीर वायले यांनी केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्याकडे केली असून याबाबत त्यांनी वारकर्यांसोबत त्यांची भेट घेत निवेदन दिले आहे.   

महाराष्ट्राच्या जनतेच्या भक्तीस्थानांपैकी एक मुख्य मंदीर व वारकरी संप्रदायाची श्रध्दा असलेले मंदीर म्हणजेच श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मीणी मंदीर. तिर्थ क्षेत्र पंढरपूर येथे ये जा करणाऱ्या भाविकांची फार मोठी संख्या आहे. परंतू श्री क्षेत्र पंढरपूर येथे आठवड्यातून एकच रेल्वेची गाडी जाते व तीच गाडी परत येते.  त्यामुळे पंढरपूर येथे ये जा करणाऱ्या भाविकांना रेल्वे प्रवास सहज व दररोज प्राप्त होत नाही. त्यामुळे नाईलाजाने त्यांना रेल्वे प्रवास सोडून अन्य मार्गाने प्रवास करावा लागतो व त्यामुळे त्यांना नाहक शारिरीक, मानसिक त्रास सहन करावा लागतो व फार मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते.

भारतीय जनता पार्टीच्या धोरणानुसार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारानुसार व इच्छेनुसार,  श्रध्देनुसार हिंदू धर्माच्या मुख्य मंदीरांचे शुशोभीकरण, नुतनीकरण करणे,  भक्तांचा प्रवास सुखकर करणे व हिंदू लोकांमध्ये देवी देवदेवतांबद्दल असलेली आस्था, भक्ती कायम जागृत ठेवून द्विगुणीत करणे हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर येथे भाविकांना, वारकरी लोकांना व तेथील स्थानिक लोकांना मुंबई ते पंढरपूर प्रवास करण्यासाठी दररोज सुरळीत व नित्यनियमाने एक्सप्रेस सेवा चालू करुन दयावी व अशा एक्सप्रेसचे थांबे  देखील वाढवावेत त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात भर पडेल व अशी रेल्वे सेवा दररोज मिळाल्याने महाराष्ट्रातील जनतेमध्ये अधिक उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. अशी मागणी सुधीर वायले यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याकडे केली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »