महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी मुंबई

अणू ऊर्जा नियामक मंडळाकडून पत्रकारांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – अणुऊर्जा नियामक मंडळाने (एईआरबी), जनतेपर्यंत पोहोचण्याच्या  उपक्रमांचा एक भाग म्हणून आणि ‘स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज, 20 सप्टेंबर 2022 रोजी मुंबई महानगर प्रदेशातील पत्रकारांसाठी एक जागरुकता कार्यक्रम आयोजित केला. पत्रकारांसाठी एईआरबी द्वारे आयोजित केलेला हा पहिलाच कार्यक्रम होता. आण्विक प्रतिष्ठानांचे सुरक्षा नियम आणि आयनीकरण विकिरण उपयोगासंदर्भात पत्रकारांना माहिती देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमात एईआरबीच्या वरिष्ठ वैज्ञानिक अधिकाऱ्यांशी चर्चा आणि वैज्ञानिक प्रदर्शनाला भेट यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला 47 पत्रकार उपस्थित होते.

समाजात माहितीचा प्रसार करण्यासाठी पत्रकारांनी बजावलेल्या भूमिकेची, एईआरबीचे कार्यकारी संचालक, सी. एस. वर्गीस यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात प्रशंसा केली. एईआरबीने देशात आण्विक आणि रेडिएशन सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मजबूत वचनबद्धता आणि व्यावसायिकता दर्शवल्याचा निष्कर्ष, जून, 2022 मध्ये आयएईए (आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा एजन्सी) च्या आयआरआरएस (एकीकृत नियामक समीक्षा सेवा) मिशनने काढला आहे. त्याच्या नियामक पद्धती, दृष्टीकोन आणि सुरक्षितता रेकॉर्डच्या बळावर, एईआरबी ला आता जगभरात समकक्ष नियामकांद्वारे एक सक्षम आणि परिपक्व नियामक म्हणून पाहिले जाते.

नजीकच्या भविष्यात भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर होणार्‍या विस्तारासाठी अधिक कार्यक्षमतेने तयारी करण्यासाठी आपल्या नियामक प्रक्रियांना आणखी औपचारिक स्वरूप देण्याचा एईआरबी सध्या प्रयत्न करत आहे.

या पार्श्‍वभूमीवर आण्विक आणि रेडिएशन तंत्रज्ञानावरील बातम्या योग्य परिप्रेक्ष्यातून आणि संदर्भाने मांडल्या जाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

सध्या एईआरबी आपल्या नियामक प्रक्रियांना अधिक औपचारिक करण्यासाठी प्रयत्न करत आहे.  अधिक कार्यक्षम बनण्यासाठी नजीकच्या भविष्यात भारतीय अणुऊर्जा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात विस्तारित करण्याची तयारी एईआरबी करत आहे. या पार्श्‍वभूमीवर आण्विक आणि किरणोत्साराच्या तंत्रज्ञानावरील बातम्या योग्य परिप्रेक्ष्यातून आणि संदर्भाने मांडल्या जाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

अणु ऊर्जा नियामक मंडळाची स्थापना 15 नोव्हेंबर 1983 रोजी करण्यात आली. अणुऊर्जा कायदा, 1962 द्वारे मिळालेल्या अधिकारांचा वापर करून अधिनियमांतर्गत काही नियामक आणि सुरक्षा कार्ये पार पाडण्यासाठी या मंडळाची स्थापना झाली आहे.. एईआरबी चे नियामक प्राधिकरण अणु ऊर्जा कायदा आणि पर्यावरण (संरक्षण) कायदा, 1986 अंतर्गत जारी केलेल्या नियम आणि अधिसूचनांनुसार तयार झाले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »