महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image क्रिडा चर्चेची बातमी

महाराष्ट्रात बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या रिले मशालीचे जोरदार स्वागत

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नागपूर – पहिली बुद्धिबळ ऑलिम्पियाड टॉर्च रिले आज महाराष्ट्रात पोहोचली आणि नागपूर आणि पुणे या प्रमुख ठिकाणांवरून मशालीचा प्रवास झाला. मशाल संध्याकाळी 6.30 वाजता मुंबईत पोहोचेल तेथून ती गोव्याकडे रवाना होईल. भारत स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत असताना, बुद्धिबळ ऑलिम्पियाडची मशाल देशातील 75 शहरांमध्ये नेली जात आहे. 19 जून रोजी नवी दिल्ली येथे मशाल  रिलेच्या ऐतिहासिक आरंभ  दिनी, फिडे या  आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संस्थेचे  अध्यक्ष आर्कडी ड्वोरकोविच यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे ही मशाल दिली त्यानंतर त्यांनी ती भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्या हातात  सुपूर्द केली होती.

यावर्षी, प्रथमच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ, FIDE (Fédération Internationale des Échecs), ने बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशालची सुरुवात केली आहे, जी ऑलिम्पिक परंपरेचा भाग आहे, मात्र, बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आजपर्यंत केली गेली नाही. यापुढे दर दोन वर्षांनी जेव्हा बुद्धिबळ ऑलिम्पियाड होईल तेव्हा भारतातून यजमान देशाकडे मशाल निघेल.28 जुलै ते 10 ऑगस्ट 2022 या कालावधीत चेन्नई येथे 44 वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड होणार आहे. 1927 पासून आयोजित करण्यात आलेल्या या मानाच्या स्पर्धेचे आयोजन भारतात प्रथमच तर आशियामध्ये 30 वर्षांनंतर केले जात आहे.

आज सकाळी राज्याची उपराजधानी नागपुरात पहिल्यावहिल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड रिले मशालीचे आगमन झाले. शहरातील प्रसिद्ध झिरो माईल येथे बुद्धिबळ मशाल रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रँड मास्टर रौनक साधवानी, दिव्या देशमुख संकल्प गुप्ता यांच्यासह नागपूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, एनसीसी कॅडेट, क्रीडा प्रेमी  उपस्थित होते. यावेळी सर्व ग्रँड मास्टरचे स्वागत उपस्थित अधिकाऱ्यांनी केले.

नंतर रॅली नागपूर शहरातील प्रमुख चौकातून मार्गस्थ झाली आणि नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेण्यात आली. तिथून ती पुण्यात पोहचली.

पहिल्या चेस ऑलिम्पियाड मशालीचे आज पुण्यात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ढोल ताशाच्या निनादात मशालीची मिरवणूकही काढण्यात आली.पुण्यातील अमनोरा टाऊनशिप मध्ये झालेल्या या शानदार समारंभासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, ग्रॅण्ड मास्टर अभिजित कुंटे, वुमन ग्रॅण्ड मास्टर ईशा करवडे, खेलरत्न पुरस्कार विजेती नेमबाज अंजली भागवत  यांच्यासह राज्य बुद्धिबळ संघटनेचे आजी माजी पदाधिकारी, शालेय विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. चेस ऑलिम्पियाड च्या निमित्तानं भारतात बुद्धिबळ या खेळाची लोकप्रियता वाढावी आणि या क्रीडा प्रकारात नवी क्रांती घडावी अशी अपेक्षा यावेळी अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केली.

गुप्ता यांच्या हस्ते यावेळी ऑलिम्पियाड ज्योत ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. नंतर ज्योत यात्रेने शनिवारवाडा आणि दगडूशेठ गणपती मंदिरात भेट दिली. त्यानंतर ही ज्योत मुंबईकडे रवाना झाली.

या ऐतिहासिक मशाल रॅलीचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी  स्टेडियमवर करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त, या रिलेमध्ये एकूण 75 शहरांचा समावेश असेल.

19 जून रोजी नवी दिल्ली येथे मशाल रिलेच्या ऐतिहासिक आरंभ दिनी, फिडे या  आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संस्थेचे  अध्यक्ष आर्कडी ड्वोरकोविच यांनी माननीय पंतप्रधान मोदी यांच्याकडे ही मशाल दिली त्यानंतर  त्यांनी ती भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्या हातात  सुपूर्द केली.ऐतिहासिक शुभारंभानंतर , मशालीने  राष्ट्रीय राजधानीतील लाल किल्ला, धरमशाला येथील एचपीसीए, अमृतसरमधील अटारी बॉर्डर, आग्रा येथील ताजमहाल आणि लखनौमधील विधानसभेसह ऐतिहासिक प्रतिष्ठा लाभलेल्या  ठिकाणी प्रवास केला.

प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच, भारत 44 व्या फिडे  बुद्धिबळ ऑलिम्पियाडचा केवळ आयोजकच नाही तर 1927 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच फिडे द्वारे स्थापित  मशाल  रिलेची सुरुवात करणारा पहिला देश आहे.आता दर दोन वर्षांनी जेव्हा बुद्धिबळ ऑलिम्पियाड होईल तेव्हा भारतातून यजमान देशाकडे मशाल निघेल.

स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असल्यामुळे 44 व्या फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत 20 खेळाडूंना स्पर्धेत  उतरवणार आहे भारताचा हा  आतापर्यंतचा सर्वात मोठा चमू आहे. भारत खुल्या आणि महिला गटात प्रत्येकी 2 संघ उतरवण्यासाठी पात्र  आहे. 188 देशांमधून  2000 हून अधिक स्पर्धक या स्पर्धेत प्रतिनिधित्व करतील, बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या इतिहासातील ही सर्वोच्च संख्या आहे. 28 जुलै ते 10 ऑगस्ट 2022 या कालावधीत चेन्नई येथे 44 वी फिडे बुद्धिबळ  ऑलिम्पियाड होणार आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »