महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

केडीएमसीच्या प्रभाग रचनेत घोळ,प्रभाग रचना सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने – आ.गणपत गायकवाड

नेशन न्युज मराठी टिम.

https://youtu.be/8JHbQgY0jUQ

कल्याण – केडीएमसी निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे. तसतसं इथलं राजकीय वातावरणही तापायला सुरुवात झाली आहे. प्रभाग रचनेमध्ये केडीएमसीने उल्हासनगरचाही काही भाग आपल्यात दाखल केल्याचा गंभीर आरोप कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. तसेच सत्ताधाऱ्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे प्रभाग रचना केल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे.

केडीएमसी निवडणुकीसाठीचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा दोन आठवड्यांपूर्वी जाहीर झाला. त्याबाबत हरकती नोंदवण्यासाठी आज अखेरच्या दिवशी कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनीही आपले आक्षेप नोंदवले. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना प्रभाग रचनेबाबत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. यंदा केडीएमसी निवडणुक प्रथमच पॅनल पध्दतीने होत आहे. तर प्रारूप प्रभाग रचनेच्या सुरुवातीलाच डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनीही आक्षेप घेतला होता. त्यापाठोपाठ आता कल्याण पूर्व विभागाचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनीही प्रभाग रचनेवर आक्षेप घेत आपली हरकत नोंदवली. केडीएमसीच्या 8 पॅनलमध्ये चूकीच्या पद्धतीने प्रभाग रचना करण्यात आल्याचे सांगत त्यातही उल्हासनगर महापालिकेचा काही भाग केडीएमसीत समाविष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार गायकवाड यांनी यावेळी केला. प्रभाग रचना करणारे महापालिका अधिकाऱ्यांनी महापालिका क्षेत्रात फिरले नसून सत्ताधाऱ्यांना जास्त मतदान होण्याच्या दृष्टीने ही प्रभाग रचना करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

तसेच पूर्वीच्या महापालिका निवडणुकीत टिटवाळा येथून प्रभाग रचना सुरू व्हायची. परंतू यंदा मात्र टिटवाळ्यापासून सुरु होणारी रचना उंबर्डेपासून सुरु करण्यात आली. म्हणजेच सत्ता असली तर सूर्य कुठूनपण उगवू शकतो अशी टीकाही गायकवाड यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

दरम्यान केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत भाजपच्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला असून अजूनही काही प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्याबद्दल विचारले असता आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले की जे नगरसेवक पक्ष सोडून गेलेत ते आमचे कधीच नव्हते. जे गेले आणि जे जाणार आहेत त्यांचे आम्हाला काही एक दु:ख नाही. आमचे कार्यकर्ते सक्षम असून ते पक्षासाठी काम करत असल्याची प्रतिक्रिया आमदार गायकवाड यांनी व्यक्त केली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »