महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

भूमिपुत्रांचा प्रश्न सोडवण्यासाठी मोदींनी ही संधी दिली – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – गेल्या ७४ वर्षांचा ठाणे जिल्ह्याचा वनवास संपला असून अखेर ठाणे जिल्ह्याला न्याय मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादामुळे मला हे मंत्रिपद मिळाले असल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्य मंत्री खासदार कपिल पाटील यांनी केले.
डोंबिवली येथील मानपाडा रस्त्यावरील मानपाडेश्वर मंदिरात २७ गाव सर्व पक्षीय हक्क संघर्ष समितीतर्फे यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला . या सत्काराला उत्तर देताना त्यांनी दि. बा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यासाठी प्रयत्न करणार असून समस्यांचे निराकरण करताना मी पूर्वीही तुमच्याबरोबर होतो आणि आताही तुमच्याबरोबर आहे असे सांगितले. पंतप्रधानांना इथल्या समस्या लवकरात लवकर सुटाव्यात असे वाटत असल्याने त्यांनी मला ही संधी दिली. इतकेच नव्हे तर ज्या जनते मुळे तुम्हाला ही संधी मिळाली आहे त्यांना जाऊन भेटा असे आदेश देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याने जन आशिर्वाद यात्रेच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत येण्याचे ठरविले असे त्यांनी सांगितले.

यावेळी गुलाबराव वझे यांनी २७ गावाच्या मालमत्ता करात १० पटीने अधिक वाढ करून भूमिपुत्रांना देशोधडीला लावण्याचा प्रकार महापालिका प्रशासन करत आहे. त्यामुळे २७ गावांची नगरपालिका वेगळी करण्याची गरज असल्याचे सांगत गेली अनेक वर्ष यासाठी लढा देत असल्याची माहिती कपील पाटील यांना संघर्ष समितीने दिलेल्या पत्राद्वारे दिली. कल्याण शिळ रस्त्यावर कपिल पाटील यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने जन आशिर्वाद यात्रा स्वागतासाठी रस्तोरस्ती फलक लावले आहेत. माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार गणपत गायकवाड, गुलाब वझे, गंगाराम शेलार, अर्जुन चौधरी, विश्वनाथ रसाळ , गजानन मग्रुळकर, चंद्रकांत पाटील, वासुदेव गायकर, विजय भाने, दत्ता वझे, भगवान पाटील, रंगनाथ ठाकूर , बाळाराम मा, भास्कर पाटील आदी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »