महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

पुरामध्ये नुकसान झालेल्या पिकांची त्वरित नुकसान भरपाई देण्याची वंचितची मागणी

सोलापूर/प्रतिनिधी – राज्यात आलेल्या महापुरामुळे अनेक नागरिक विस्थापित झाले असून सरकारने त्यांचे तातडीने पुनर्वसन करून नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे मोहोळ तालुका अध्यक्ष राजू आवारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी मागण्याचे निवेदन तहसीलदार जीवन बनसोडे यांना देण्यात आले.तहसीलदाराना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जुलै 2021 या वर्षी दोन दिवसांमध्ये साधारण 1600 मी.मी.इतका पाऊस झाला असून पावसाच्या किमान 90 टक्के पाऊस पडला आहे.त्यामुळे दरड कोसळणे, शेतजमीन खरडून जाणे तसेच उभी पिके वाहून गेली आहेत.शेतकऱ्यांच्या शेतात दगड गोटे शिल्लक राहिले आहेत.

या महापुरात मागासवर्गीय अल्पभूधारक भरडले गेले आहेत.लहान बालके व महिलांच्या अडचणीत वाढ झाली आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कारखान्यांनी नुकसान भरपाई द्यावी व तशा प्रकारचा आदेश शासनाने कारखान्याना द्यावा. कापूस,सोयाबीन,डाळ,फळे,भाज्या,उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानी बाबत सरकारने पिकांची जाहीर केलेली एफआरपी आणि एमएसपी घाऊक तसेच किरकोळ बाजारात अडलेली धान्याची आणि पिकांची किंमत मुल्यधारीत करून संबधित शेतकऱ्याला पिकांची आणि उत्पादनाची किंमत मदत म्हणून करावी.महापुरात झालेल्या नुकसानी बाबत सरकारी निकषांनुसार केली जाणारी मदत तुटपुंजी आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादन होण्याऱ्या पिकाचे बाजरी मूल्य भरपाई म्हणून शेतकऱ्यांला मिळावे.नुकसानीमुळे दुबार पेरणी करणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार भाव प्रमाणे झालेल्या नुकसान भरपाईची मदत करावी.यावेळी ता.अध्यक्ष राजेंद्र आवारे,प्रकाश सोनटक्के, सचिन गवळी,शशिकांत सोनवणे आदी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »