DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – अवकाळी पाऊस आणि सद्यस्थितीत देशात युद्धजन्य निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर होऊ घातलेली कल्याण एपीएमसी मार्केटची निवडणूक सहा महिन्या नंतर पावसाळ्या संपल्यावर घेण्यात यावी अशी मागणी लक्ष्मी मार्केट भाजीपाला संघटनेने केली आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असते.कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भूखंड घोटाळा,गाळे वाटप घोटाळा,बांधकाम घोटाळा ,नोकर भरती घोटाळा अशा अनेक घोटाळ्यातील भ्रष्टाचाराने बाजार समिती कलंकित झाली आहे.या सर्व घोटाळ्यात अंदाजे दोन हजार कोटी पेक्षा अधिक रुपयां भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात असून या भ्रष्टाचाराची चौकशी केंद्रीय यंत्रणा व पणन संचालकाच्या मार्फत सुरू आहे.बाजार समितीतील संचालक मंडळाचा कार्यकाल होऊन बरखास्त झाल्या नंतर बेकायदेशीर पने तीन वेळा मुदत वाढ घेऊन आपले काळे कारनामे लपविण्याचा प्रयत्न केला आहे अखेरीस पणन मंडळाने सद्यस्थितीला बाजार समितीचा कारभार चालवण्यासाठी प्रशासक नेमल्याने समिती मंडळाच्या भ्रष्टाचारावर नियंत्रण आणल्याने भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी समितीने निवडणूका घेण्याचा डाव रचला आहे .राज्य सहकार निवडणूक प्राधिकराणे निवडणूक घेण्याचा हालचाली सुरू केल्या असून बाजार समितीच्या निवडणूकी संदर्भात व्यापारी यादी,माथाडी यादी,शेतकरी मतदार यादी,,ग्रामपंचायत यादी बनविण्याचे काम सुरू केले असून या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ केला असल्याने याद्याची अद्यापही पूर्णता: पूर्तता झाली नसताना निवडणूक प्रक्रियेला जोरदार हालचाली सुरू आहे.असे संघटनेचे म्हणणे आहे.त्यामुळे जो पर्यंत मतदार याद्या व अन्य निवडणूकी संदर्भात पूर्तता होत नाही तो पर्यंत काही काळ प्रशासकीय राजवट ठेवावी व कल्याण बाजार समितीची निवडणूक घेण्यात येऊ नये अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे.
त्याच बरोबर हीच मागणी सचिव राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण ,पणन संचालक महाराष्ट्र राज्य, खासदार सुरेश ( बाळ्या मामा) म्हात्रे,आमदार रवींद्र चव्हाण यांना निवेदनाद्वारे द्वारे करणार असल्याची माहिती लक्ष्मी मार्केट भाजीपाला व्यापारी संघटनेचे सचिव रामदास यादव उपाध्यक्ष रफिक तांबोळी, गोविंद गौतम यांनी दिली.
सद्यस्थितीत मुंबई ,ठाणे परिसरात पडत असलेला अवकाळी पावसाची वरस्तुस्थिती तर दुसरीकडे सद्यस्थितीत देशात युद्धजन्य निर्माण झाली असून केंद्र सरकारने भारत पाकीस्तान युद्धाचे पडसाद उमटत असल्याने या पार्श्वभूमीवर होऊ घातलेली कल्याण एपीएमसी मार्केटची निवडणूक सहा महिन्या नंतर पावसाळ्या संपल्यावर घेण्यात यावी अशी मागणी लक्ष्मी मार्केट भाजीपाला संघटनेने केली आहे. सद्य स्थितीचा विचार न करता एपीएमसी मार्केट ची निवडणुका निवडणूक प्राधिकरणाने सहा महिने पुढे ढकलली नाही तर या भ्रष्टाचाऱ्यांना निवडणूक प्राधिकरण पाठीशी घालत असल्याचे दिसून येईल तसे न झाल्यास शेतकरी व व्यापारी संघटना व अन्य सर्व घटक आमरण उपोषणाला बसणार असून त्यामुळे होणाऱ्या परिणाम सहकार निवडणूक प्राधिकरण व सरकार जबाबदार असल्याचे व्यापारी संघटनेने सांगितले.
रामदास यादव सचिव लक्ष्मी मार्केट भाजीपाला व्यापारी संघटनायांनी सांगितलेली एपीएमसी मार्केट मधील संचालक मंडळाने केलेल्या भ्रष्टाचार लपविण्यासाठी संचालक मंडळाची निवडणूक लावण्याचा घाट रचला आहे.सद्य स्थितीत संचालक मंडळ बरखास्त झाल्याने प्रशासक नेमण्यात आल्याने भ्रष्टाचाराला आळा बसला असल्याने निवडणुका घेतली जात आहे मात्र सद्या अवकाळी पाऊस पडत आहे पावसाळा संपल्यावर सहा महिन्याने निवडणूक घ्यावी असे सांगितले.
प्रशांत माळी अध्यक्ष भाजीपाला फळ फुले कल्याणकारी संस्था एपीएमसी व्यापारी संघटना यांनी सांगितले की भारत पाकिस्तान युद्य तसेच ठाणे जिल्हयात होणाराअवकाळी पाऊस, कल्याण बाजार समिती मतदार यादयांमध्ये झालेला घोळ माजी सभापती व काही सचालक यांच्या भ्रष्टाचारी चौकशी होई पर्यंत सद्य स्थितीत निवडणूक सहा महिन्यासाठी पुढे ढकलून पावसाळा नंतर निवडणूक घ्या अशी मागणी केली आहे.