DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रमोद तांबे – कल्याण-डोंबिवली परिसरात सध्या वाहतूक पोलिसांकडून रिक्षांमध्ये चौथ्या सीटवर बसवलेले प्रवासी आढळल्यास कडक कारवाई केली जात आहे. याच कारवाईला रिक्षा चालक-मालक संघटनेने विरोध दर्शवत आज कल्याण वाहतूक विभागाचे एसीपी यांना निवेदन दिलं.संघटनेचा आरोप आहे की, ‘ओव्हरसिट कलमाखाली’ केवळ रिक्षा चालकांवरच कारवाई होत असून, अन्य वाहने यामधून सुटत आहेत. जर ही कारवाई तात्काळ थांबवली नाही, तर प्रवाशांना वेटीस धरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.तर यावेळी वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकांना रिक्षात चौथ्या सीटवर बसवणं हे परवान्याच्या अटींचं उल्लंघन आहे. या सीटवर बसलेल्या प्रवाशाचा अपघात झाल्यास त्याचा इन्शुरन्स क्लेमही अमान्य ठरतो. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरुच राहणार असल्याचा इशारा दिला आहे
कल्याण-डोंबिवली परिसरात रिक्षांमधील चौथ्या सीटवर बसलेल्या प्रवाशांवर वाहतूक पोलिसांनी सुरु केलेली दंडात्मक कारवाई आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. याला विरोध करत आज कल्याण वाहतूक विभागाचे एसीपी यांना रिक्षा चालक-मालक संघटनेकडून निवेदन देण्यात आले.संघटनेचा आरोप आहे की, ओव्हरसिट कलमांतर्गत केवळ रिक्षाचालकांवरच १० हजार रुपयांचा दंड लावला जात असून, अन्य खासगी किंवा सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांवर कारवाई होत नाही. फक्त आमच्यावरच का?” असा सवाल रिक्षा संघटनेने उपस्थित करत पोलिसांनी ही एकतर्फी कारवाई तात्काळ थांबवावी. अन्यथा प्रवाशांना वेटीस धरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तर यावेळी वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकांना रिक्षात चौथ्या सीटवर बसवणं हे परवान्याच्या अटींचं उल्लंघन आहे. या सीटवर बसलेल्या प्रवाशाचा अपघात झाल्यास त्याचा इन्शुरन्स क्लेमही अमान्य ठरतो. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरुच राहणार असल्याचा इशारा दिला आहे