महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी देश

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांनी स्वीकारला पदभार

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली – भारत सरकारच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या दिनांक  12 मे 2022 च्या  राजपत्र अधिसूचनेनुसार देशाचे  25 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांनी आज नवी दिल्लीतील निर्वाचन सदन,  भारत निवडणूक आयोग, येथे  पदभार स्वीकारला.

राजीव कुमार हे 1 सप्टेंबर 2020 पासून निवडणूक आयुक्त म्हणून भारत निवडणूक आयोगामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या  निवडणूक आयुक्त पदाच्या  कार्यकाळात, कोविड चिंतेच्या काळात  2020 मध्ये बिहार आणि  मार्च-एप्रिल 2021 मध्ये आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पश्चिम बंगाल विधानसभांच्या निवडणुका तसेच  2022 च्या सुरुवातीला गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकादेखील झाल्या.

भारतीय राज्यघटनेने  भेट दिलेल्या सर्वोत्तम संस्थांपैकी एक-  आपली  लोकशाही बळकट करणाऱ्या या संस्थेचे  नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळणे हा मोठा सन्मान असल्याची भावना राजीव कुमार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यावर व्यक्त केली. गेल्या सत्तर वर्षात, आपल्या निवडणुकांची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी,  मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी, मतदार यादीची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने   बरेच काम  केले आहे, असे त्यांनी सांगितले.  “राज्यघटनेअंतर्गत दायित्व असलेल्या कोणत्याही मोठ्या सुधारणा घडवून आणण्यासाठी आयोग काळाच्या कसोटीवर उतरलेल्या आणि लोकशाही पद्धतींच्या  सल्लामसलत आणि सहमती निर्माण करण्याच्या पद्धतींचे  अनुसरण करेल. भारत निवडणूक आयोग  कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाही”, असे ते  म्हणाले.

मतदार सेवा सुलभतेसाठी  अधिक  चांगले निवडणूक व्यवस्थापन आणि कार्यान्वयासाठी आणि प्रक्रिया आणि पद्धती सुलभ करण्यासाठी तसेच पारदर्शकता विषयक पद्धती आणण्यासाठी  तंत्रज्ञान हे प्रमुख साधन म्हणून उपयोगात आणले जाईल, असेही कुमार यांनी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »