महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

सार्वजनिक उद्योग वाचले तरच आरक्षण वाचेल- अॅड. प्रकाश आंबेडकर

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – आपली जर विचारधारा सुस्पष्ट असेल तर आपल्याला परिस्थिती आरशा प्रमाणे दिसते. ज्यात चूक बरोबर दोन्ही गोष्टी दिसतात, भविष्यात होऊ पाहणारे बदल देखील दिसतात. ही विचारधारा सुनिश्चित असेल तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. मी असं म्हणेन, आपण नेहमी सत्तेचं राजकारण करतो. माझ्या मते, राजकारण हा आरसा आहे. सत्ता ही नंतरची गोष्ट आहे. समाजात बदल आला तो तर तो राजकारणाच्या आरशात दिसेल. राजकारणात बदल नसल्यान आरश्यात वेगळं काही दिसणार नाही. प्रतिबिंब बनविण्यासाठी मूळ चित्र बनवावे लागते. इतिहासातून आपण फक्त शिकू शकतो पुन्हा तसं नाही करू शकत. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आताची वेगळी आहे.

समकालीन राजकारण आणि अंबेडकरवादी आकलन या पुस्तकाचे प्रकाशन प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसच्यावतीने करण्यात आले.

यावेळी अॅड. आंबेडकर म्हणाले, डिमांड आणि सप्लायची थियरी माहित असेल त्यामुळे परिणाम दिसत राहतात. आजच्या या मटेरियलिस्टिक जगात स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारणं आणि सक्षम होणं ही प्रत्येकाची गरज झाली आहे. आरक्षण च्या मुद्द्यावर सगळेच चिंतीत आहे. आज पुन्हा त्या वर्गाला परिणामांचा आरसा दाखवण्याची गरज आहे. सध्याची बिघडलेली परिस्थिती दंगलीचे राजकारण करण्याचे प्रयत्न, देशभरात दंगली होणार अशी चर्चा होती. मागील दोन वर्षाच्या कोविडने सगळ्यांची आर्थिक परिस्थिती इतकी कमकुवत केली. त्यामुळे नागरिकांनी देखील त्यात हात पाय न अडकवता या राजकारणापासून स्वतःला लांब ठेवले. हा एक प्रकारचा बदल आहे. खाजगीकरणाचा मुद्दा निघाला तेव्हा आरक्षणवर होणाऱ्या परिणामाबद्दल देखील विचार झाला. आरक्षण बाबत बोलायचे झाले तर वुई (we) बद्दल बोलावं लागेल. पब्लिक सेक्टर मोठा असल्याचे जागतिकीकरणाचा धाव आपल्यावर आर्थिक दृष्टिकोनातून झाला नाही. आपली इकॉनॉमी सक्षम आहे ज्याचे कारण म्हणजे खाजगी सेक्टर पेक्षा दहापटीने मोठा असलेला पब्लिक सेक्टर आहे. यासाठी सरकारने म्हणायला हवं होतं पब्लिक सेक्टर वाचले पाहिजे आणि ते वाचले तर आरक्षण वाचेल. ज्यामुळे आर्थिक दृष्ट्या देखील आपण सुरक्षित राहू शकतो. पण दुर्भाग्याने आपण वुई (we) तर सोडाच आय (I) झालो आहोत ही सगळ्यात मोठी कमजोरी आहे आणि धार्मिक शक्ती वाढतेय.

आपण जो पर्यंत स्वकेंद्रित आयुष्य सोडून जगत नाही नाही तो पर्यंत बदल दिसून येणार नाही. इंडियन नेस ही ओळख जाऊन आता हिंदुत्वाचा धार्मिक रंग चढला आहे. मात्र जिंकणार तोच जो विचारधारेला धरून चालले आणि त्याचा प्रचार-प्रसार करेल. आता विचारांचा आणि विचारांच्या प्रतिनिधींचे दिसणे आवश्यक आहे. बाबासाहेबांनी म्हटलंय, रिव्होल्यूशन आणि काउंटर रिव्होल्यूशन ज्या दिवशी रिव्होल्यूशन थांबेल त्यादिवशी काउंटर रिव्होल्यूशन जिंकेल. आपली दर्शनी स्वरूपातील विचारधारा मतांच्या रूपात दिसली नाही तर तुम्ही लोकशाहीत जगणे कठीण आहे. तोच टक्का व्यवस्थेला कंट्रोल करतो.

असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज (१० मे) यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान सभागृहात व्यक्त केले. त्याच्या समकालीन राजकारण आणि आंबेडकरवादी आकलन या पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. बाळासाहेब आंबेडकर यांनी २०१७ पासून लिहिलेल्या अग्रलेखांच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि चौफेर विषयांवर केलेले लेखन या पुस्तकात संपादित केले आहे.

या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दिलीप मंडल, हिंदी सिनेदिग्दर्शक नीरज घायवान, ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, आमदार कपिल पाटील, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारी अध्यक्ष भीमराव आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, भारिप बहुजन महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर, जितरत्न पटाईत, वैभव खेडेकर यासंह, वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »