महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजरूम

भिवंडी ते नवी मुंबई कार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्द प्रतिसाद ; हजारो नागरिक सहभागी,खा.बाळ्या मामा यांनी केले नेतृत्व

DESK MARATHI NEWS NETWORK.

भिवंडी/प्रतिनिधी – नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या नेतृत्वाखाली रविवारी भिवंडी ते नवी मुंबई कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या कार रॅलीला स्थानिक भूमिपुत्रांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हजारो नागरिक या कार रॅलीत सहभागी झाले होते.

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी सुरुवातीपासूनच ठाणे, रायगड,पालघर,मुंबई,नवी मुंबई भूमिपुत्र आगरी कोळी समाज सुरुवातीपासून आग्रही आहे. महाराष्ट्र शासनाने सुद्धा विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असताना केंद्र शासनाकडून याबाबत अजूनही चाल ढकल केली जात आहे यामुळे समजता प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या कार रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया यावेळी खा.बाळ्या मामा यांनी दिली आहे.

विमानतळास स्व.दि.बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी,केंद्र सरकारला जागे करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून ठाणे व रायगड जिल्ह्यातून या चांगला प्रतिसाद भूमिपुत्रांसह बहुजन समाजाचा मिळाला आहे.आम्हाला खात्री आहे या आंदोलनाची दखल केंद्र सरकार घेऊन तत्काळ नामकरण करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल.या मध्ये केंद्र सरकारने काही काळेबेरे केल्यास हा लढा अधिक तीव्र करून उद्घाटन सोहळा होऊ देणार नाही असा इशारा खासदार बाळ्या मामा यांनी यावेळी दिला आहे.
या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी भिवंडी शहरावतीने अध्यक्ष प्रदीप शिर्के यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त करणारे पत्र खासदार बाळ्या मामा यांना दिले.तर या रॅलीत अनेक संस्था संघटनांनी सहभाग घेतला होता.विशेष म्हणजे या रॅलीचे तालुक्यातील मानकोली,हायवे दिवे पाठोपाठ खारेगाव,कळवा, विटावा या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रांनी जल्लोषात पारंपरिक वेशभूषेसह महिलांनी कोळी नृत्य सादर करून स्वागत केले.

या रॅलीत ठाणे जिल्ह्या तील ज्येष्ठ नेते आर सी पाटील,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विश्वास थळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे,शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन पाटील,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष डॉ. रूपाली कराळे,माजी जिल्हा परिषद सदस्या शारदा सुरेश म्हात्रे यांसह मोठ्या संख्येने भिवंडी तालुक्यातील बहुजन समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »