महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
देश न्युजरूम

“मातृभाषेचा अभिमान बाळगतांना अन्य भाषांचा सन्मान करावा”-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

DESK MARATHI NEWS NETWORK.

नवी दिल्ली/प्रतिनिधी –  भाषा  हे संवादाचे प्रभावी साधन असून या  माध्यमातून  ज्ञानाचा खजिना उपलब्ध होतो. प्रत्येकाने  आपल्या मातृभाषेचा  अभिमान  बाळगताना इतर  भारतीय भाषांचा देखील सन्मान ठेवला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले.दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘श्री. छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि सरंक्षण विशेष अध्यासन केंद्र ’  आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषासाहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले.  याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंतजवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. शांतिश्री धुलिपुडी पंडित तंजावर घराण्याचे  छत्रपती बाबाजीराजे भोसलेकुलसचिव प्रा. रविकेश  उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरिक दूरदृष्टी आणि युद्धनीतीचा अभ्यास जेएनयूसारख्या प्रतिष्ठित संस्थेत सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “युनेस्कोने शिवरायांच्या 12 किल्ल्यांना ‘मराठा मिलिट्री लँडस्केप’ म्हणून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. शिवाजी महाराजांनी सह्याद्रीपश्चिम घाट आणि समुद्रकिनारी अभेद्य किल्ले बांधून परकीय धोके ओळखले आणि मराठ्यांना संपूर्ण भारतात आपला झेंडा फडकवण्यास प्रेरित केले. शिवरायांच्या युद्धनीतीचा आजही जगभरात कौतुक होते आहे. महाराजांची प्रत्येक लढाई हे सामरीक शक्तीचे उदाहरणं असून शिवाजी महाराजांमुळे स्वराज्याची स्थापना झाली आहे. मराठी माणसामध्ये विजिगीषूवृत्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजविली असल्याचेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.

मराठी ही अतिप्राचीन भाषा आहे. आपल्या नेव्हीच्या ध्वजावर राजमुद्रा लावण्यात आली आहे आणि आता मराठीची राजमुद्रा देखील दिल्लीत लागली आहे. आजही मराठी साहित्यमराठी नाट्यसृष्टी ही सर्वोत्तम आहे. थिएटर देखील ज्या भाषेने टिकवले ती भाषा म्हणजे मराठी. सगळ्या विद्यापीठांत मराठी भाषेवर संशोधन झाले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. जेएनयू परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली असून  हा पुतळा देशासाठी बलिदान आणि समाजसेवेची प्रेरणा देईलअसा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी जेएनयूमधील मराठी अध्यासन केंद्राची स्थापना हा ऐतिहासिक टप्पा असल्याचे नमूद केले.  काश्मीरमध्ये मराठी पुस्तकांचे गावपरदेशात मराठी बृहन मंडळे  निर्माण करणार असल्याचे सांगितले.यावेळी नाशिक येथील विश्व मराठी संमेलनाचे निमंत्रण देत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जेएनयूमध्ये प्रवेशासाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे  डॉ सामंत यांनी यावेळी सांगितले.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या  कुलगुरू प्रा. शांतीश्री पंडित यांनी मराठी साहित्यनाटक आणि कवितेचे महत्त्व विषद केले. प्रा. पंडित यांनी ‘सिंधुदुर्ग संवाद’ या राष्ट्रीय संवाद कार्यक्रमाची घोषणा केली आणि जेएनयूला समानतागुणवत्ता आणि नाविन्यावर आधारित अग्रगण्य विद्यापीठ असल्याचे नमूद केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत 50 भारतीय भाषांच्या अभ्यासाला चालना देण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख करत त्यांनी मराठी विद्यार्थ्यांना जेएनयूमध्ये प्रवेशासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघधनंजय महाडिकमेधा कुलकर्णीहेमंत सावराअनिल बोंडेअजित  गोपचाडेमाजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला  यासह केंद्र शासनाचे विविध विभागातील अधिकारीजेएनयू मधील प्राध्यापक आणि मराठीप्रेमी  उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »