महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी देश

भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत 2023 च्या तुकडीतील अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती यांची घेतली भेट

DESK MARATHI NEWS.

नवी दिल्ली/प्रतिनिधी -विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये सध्या सहाय्यक सचिवपदावर कार्यरत असलेल्या 2023 च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांच्या एका गटाने आज (15 एप्रिल 2025 रोजी) राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

या आयएएस अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की हे अधिकारी  असामान्य निर्धार आणि कठोर मेहनतीच्या माध्यमातून आयएएस अधिकारी बनले आहेत. यातून त्यांच्या वैयक्तिक जीवनात बरेच परिवर्तनकारी बदल घडून आले आहेत आणि आता आधीपेक्षा अधिक दृढ निश्चय आणि समर्पणासह देशातील असंख्य लोकांच्या आयुष्यात परिवर्तनकारी बदल घडवून आणण्याची संधी त्यांना मिळालेली आहे. त्यांच्या सेवेचा आवाका आणि अधिकार इतका प्रचंड आहे की ते त्यांच्या पहिल्याच नेमणूकीदरम्यान अनेक  नागरिकांच्या जीवनात सुधारणा घडवून आणू शकतात असे मत राष्ट्रपतींनी नोंदवले. वंचित वर्गाच्या उत्थानासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. या अधिकाऱ्यांनी नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये यांची जाणीव ठेवायला हवी असे मुर्मू यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, लोक सेवकांची कर्तव्ये ही त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांचे हक्क हे ती कर्तव्ये निभावण्याचे साधन आहे.

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की प्रत्येक लोक सेवकाने प्रामाणिक हेतूने कार्य केले पाहिजे. आपणा सर्वांना सध्या पर्यावरणीय प्रदूषण आणि हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे, त्याचबरोबर अनैतिकतेमुळे झालेले प्रदूषण आणि मूल्यांचा ऱ्हास ही देखील अत्यंत गंभीर आव्हाने आहेत. यावर मात करण्यासाठी समर्पित आणि प्रामाणिक असणे किती गरजेचे आहे हे वेगळे सांगायला नको.प्रामाणिकपणा, सत्य आणि साधेपणा ही जीवनमूल्ये अनुसरणारे लोक अधिक आनंदी असतात. लोकसेवेत प्रामाणिकपणा ही सर्वात आवश्यक असलेली नीती आहे असे त्यांनी सांगितले.

उपस्थित अधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांशी जवळीक साधावी आणि स्थानिक प्रयत्नांमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी दिला.या अधिकाऱ्यांनी स्थानिक तसेच राज्य पातळीवर केलेली विकास कामे आणि समाजकल्याण कार्ये राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करतील असे त्या म्हणाल्या.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »