महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

असं एक गाव जिथं होळीला जावायांची काढतात गाढवावर बसून धिंड

नेशन न्युज मराठी टिम.

बीड – जावई म्हटले की मानपान… लाड आणि सरबराई ओघाने आलीच; पण बीड जिल्ह्यात एक गाव असेही आहे जेथे धुळवडीला जावयाची चक्क गाढवावरून मिरवणूक काढली जाते.बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा या गावाने ९० वर्षांपासून ही परंपरा जपली आहे. कोरोना संक्रमणामुळे दोन वर्षांपासून या परंपरेत खंड पडला होता. यंदा पुन्हा ही परंपरा पूर्ववत सुरू होणार असल्याने विड्याच्या जावयांनी चांगलाच धसका घेतला आहे.
हजारावर उंबरे व सात हजार लोकसंख्येचे विडा निजाम राजवटीत जहागीरदारीचे गाव म्हणून ओळखले जाई. तत्कालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांचे बाळनाथ चिंचोली (जि. लातूर) येथील मेहुणे धूलिवंदनाच्या दिवशी विड्याला आले होते. त्यांचा खास पाहुणचार केला गेला. मात्र, तेव्हा गावातील कर्त्या मंडळींनी त्यांची थट्टा मस्करी करून चक्क गाढवावर बसून सवारी काढली. तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा अजूनही कायम आहे. काेरोनामुळे २०२० व २०२१ या दोन वर्षांत या परंपरेत खंड पडला. यंदा मात्र ही परंपरा पुन्हा सुरू होणार असल्याची चाहूल लागताच अनेक जावई भूमिगत झाले आहेत. रंगांची उधळण करीत हलगीच्या तालावर थिरकणारी तरुणाई व आबालवृद्धांंचा सहभाग यामुळे या परंपरेची परिसरात भलतीच उत्सुकता असते. १८ मार्च रोजी जावयाची जोरदार मिरवणूक काढण्यासाठी गाढवापासून ते जावयापर्यंत शोधाशोध सुरू झाली आहे. गोविंद देशमुख, नारायण वाघमारे, महादेव पटाईत, शहाजी घुटे, रावसा पटाईत आदी यासाठी परिश्रम घेत आहेत.
ना वाद ना विवाद 90 वर्षांची आहे परंपरा..
विड्यातील या अनोख्या परंपरेला आता ९० वर्षे होत आहेत. मात्र, एकदाही भांडण-तंटे झाले नाहीत. विशेष म्हणजे गर्दभ मिरवणुकीसाठी सर्व जाती-धर्माच्या जावयांना आतापर्यंत मान मिळालेला आहे. जाती-धर्मापेक्षा तो गावचा जावई आहे ना… बस्स एवढीच एक अट असते. त्यामुळे सर्वांचा सहभाग असतो. यातून सामाजिक सलोखा व एकोपाही जपला गेला आहे.
कोरोना संकटानतर यंदा मिरवणूकजावयाची गाढवावरून मिरवणूक काढल्यानंतर त्यांचा मंदिरात अहेर देऊन सन्मानही केला जातो. दोन वर्षांनंतर यंदा मिरवणूक काढली जाणार असून, तरुणांमध्ये उत्साह आहे. जावयाच्या शोधासाठी दोन टीम पाठविल्या आहेत असे गावचे सरपंच सूरज पटाईत यांनी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »