महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

भिवंडी लोकसभेत नव्या राजकीय समीकरणाची नांदी;महापालिका निवडणुकीत दिसणार नविन राजकीय चित्र?

DESK MARATHI NEWS.

कल्याण/प्रतिनिधी – ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या भिवंडी लोकसभेत नव्या राजकीय समीकरणाची नांदी होताना दिसत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख साईनाथ तारे आणि जिजाऊ सामाजिक संस्थेचे प्रमुख निलेश सांबरे यांच्या वाढत्या भेटीगाठी मोठ्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साईनाथ तारे आणि निलेश सांबरे यांच्यातील ही जवळीक नव्या राजकीय बंधनाचे द्योतक असल्याचे बोलले जात आहे.

भिवंडी लोकसभेतील राजकीय परिस्थितीचा विचार करता गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत निलेश सांबरे यांनी अपक्ष निवडणूक लढवली असतानाही तब्बल अडीच लाखांच्या आसपास मते घेतली होती. तर साईनाथ तारे हेज्या पक्षाचे नेतृत्व करत आहेत त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुमारे ३ ते ३.५ लाख मते आहेत. साईनाथ तारे आणि निलेश सांबरे हे एकत्र आले तर आगामी निवडणुकीत मतांचा हा आकडा 6 लाखांचा टप्पा पार करू शकतो.
आणखी खोलात जाऊन राजकीय समीकरणाचा विचार केल्यास निलेश सांबरे हे कुणबी समाजाचे आहेत. तर साईनाथ तारे हे आगरी समाजाचे असून तारे ह्यांचे आगरी, कोळी , कुणबी, आदिवासीं,खानदेशी, मुस्लिम, बहुजन अशा सर्व समाजांत एक वेगळे स्थान आहे. त्यासोबतच ठाणे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी तारे यांचे घरोब्याचे संबंध आहेत. एक मितभाषी, अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. तर निलेश सांबरे यांनाही कुणबी, आदिवासीं आणि बहुजन समाजामध्ये मानाचे स्थान असून आपल्या सामाजिक उपक्रमांमुळे हा समाजही त्यांच्याशी चांगला जोडला गेला आहे. सांबरे यांनी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत ठाणे, पालघर, रत्नागिरी अशा विविध जिल्ह्यांत समाजातील सर्व घटकांसाठी वैद्यकीय, शैक्षणिक, रोजगार, व्यवसाय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. इतकेच नाही तर महिलांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी लघू उद्योग प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीसाठीही जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून मोठी मदत केली आहे.

त्यातच गेल्या काही दिवसांपासून निलेश सांबरे आणि साईनाथ तारे यांच्यात वाढलेल्या भेटीगाठींनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या दोन्ही नेत्यांचे असणारे राजकीय स्थान, सामाजिक ताकद आणि पाठशी असणारी मतांची आकडेवारी पाहता या दोन नेत्यांच्या एकत्र येण्यामुळे भिवंडी लोकसभेतील एका नव्या राजकीय समीकरणाची नांदी होताना दिसत आहे. ज्या बदलांचे संकेत या नेत्यांच्या सततच्या गाठीभेटीतून स्पष्टपणे जाणवत आहेत. त्यांची ही राजकीय जवळीक आणखी कुठपर्यंत जाते हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »