महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम राजकीय

बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करण्यापूर्वी शिवसेनेने स्वतःचे चारित्र्य तपासावे-वंचित बहुजन आघाडी

DESK MARATHI NEWS.

मुंबई/प्रतिनिधी -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या मुखपत्र ‘सामना’मध्ये १४ एप्रिल रोजी प्रकाशित अग्रलेखात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर केलेल्या टीकेला वंचित बहुजन आघाडीने तीव्र प्रतिवाद केला आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी या टीकेला उत्तर देताना बाळासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आणि राजकीय लढ्यांचे उदाहरण देत शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सिद्धार्थ मोकळे यांनी स्पष्ट केले की, फुले चित्रपटावर ब्राह्मण संघटनांकडून विरोध झाल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते होते ज्यांनी या चित्रपटाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाला विरोध करत चित्रपटातील महत्त्वाच्या दृश्यांच्या कापणीविरोधात ठाम भूमिका घेतली. या संघर्षात महाविकास आघाडीतील कोणताही पक्ष सहभागी झाला नव्हता.

मोकळे यांनी शिवसेनेच्या इतिहासावर प्रकाश टाकताना म्हटले की, शिवसेना २५ वर्षे भाजपसोबत युतीत होती आणि गोध्रा हत्याकांडाच्या वेळी भाजप व नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभी राहिली होती. अशा पक्षाने बाळासाहेब आंबेडकरांसारख्या नेत्यावर टीका करणे हे हास्यास्पद आहे. त्यांनी शिवसेनेला स्वतःचा राजकीय इतिहास तपासण्याचा सल्ला दिला.

बाळासाहेब आंबेडकर हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात न्यायालयीन, राजकीय आणि सामाजिक स्तरावर लढा देत आहेत. संध्याकाळी सहानंतर झालेल्या मतदानाच्या विरोधात त्यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात न्यायालयीन लढाई सुरू केली आहे. महाराष्ट्रात सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाच्या पोलीस कोठडीत झालेल्या हत्येविरोधात त्यांनी रस्त्यावर उतरून आणि न्यायालयात महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या विरोधात लढा दिला आहे. तसेच, बिहार मधील महायुती सरकारच्या विरोधात महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात यावा यासाठीही त्यांनी लढा दिला आहे.

वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले की, बाळासाहेब आंबेडकर हे जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारे नेते आहेत. त्यांच्यावर कितीही टीका केली गेली तरी ती सूर्यावर थुंकण्यासारखी आहे. त्यामुळे स्वतःचे चेहरे रंगवून घेणे आता थांबवा. बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या भूमिकेचा पुनर्विचार करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »