महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी पर्यावरण

पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ सरकारची नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी – आयुक्त अभिनव गोयल

DESK MARATHI NEWS.

कल्याण/प्रतिनिधी -मानवाला निसर्गाने विनामूल्य असा पर्यावरण रूपी ठेवा दिला आहे.त्याचे रक्षण व जतन करण्याची जबाबदारी ही प्रत्येक मानवाची आहे, पण मानवाकडून विकासाच्या नावावर अनेक कारणाने पर्यावरणाचा रास होतांना दिसत आहे. जर मानवाच्या पुढच्या पिढीला सुखाने नांदवायचे असेल तर पर्यावरणाचे रक्षण करणे ही खूप महत्वाची बाब आहे. आपले अस्तित्व मानवाला टिकवायचे असेल तर जमेल त्या मार्गाने पर्यावरणाच्या रक्षणाचे प्रयत्न केले पाहिजेत, यासाठी सरकारी पातळीवर विविध उपक्रम राबवून पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. 

शासकीय मार्गदर्शक सूचनानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने वसुंधरा दिनाचे औचित्य साधून दिनांक २२ एप्रिल २०२५ ते १ मे २०२५ या कालावधीत जागतिक वसुंधरा दिन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने दुर्गाडी किल्ल्याजवळील गणेश घाट परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या उपक्रमात महापालिका आयुक्त अभिनव गोयल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त संजय जाधव तसेच महापालिका सचिव किशोर शेळके यांचे सह महानगरपालिकेचे विविध अधिकारी व कर्मचारी, इंडियन मेडिकल असोसिएशन चे प्रतिनिधी, विविध सेवाभावी संस्था, NGO आणि “मनुसृष्टी पर्यावरण सल्लागार” संस्थेच्या प्रतिनिधी उपस्थित होते.या मोहिमे दरम्यान खाडी किनाऱ्यावर साचलेला प्लास्टिक कचरा, प्लास्टिक बाटल्या, पिशव्या आणि इतर घाणीची साफसफाई करण्याचे अभियान राबवण्यात आले.

पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ सरकारची नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि निसर्गाशी सुसंवाद राखणे, हीच वसुंधरा दिनाच्या साजरीकरणाची खरी दिशा आहे. महानगरपालिका अशा उपक्रमांद्वारे सातत्याने नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करत राहील असे आयुक्त अभिनव गोयल यांनी  यावेळी  सांगितले.
महानगरपालिकेच्या वतीने वसुंधरा दिन सप्ताहात अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी स्लोगन स्पर्धा, शॉर्ट व्हिडिओ स्पर्धा , नागरिकांचे त्यांच्या प्रभागात पर्यावरण उत्तम राहण्यासाठी चे सूचीबद्ध कार्यक्रम प्रस्ताव संकल्पना सादरीकरण करणे अशा विविध स्पर्धांचा या उपक्रमांतर्गत समावेश आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »