DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पूर्वेकडील सप्तशृंगी इमारतीच्या चौथ्या माळ्यावरील स्लॅब कोसळून यात सहा जणांना मृत्यू झाल्याची दुर्घटना तीन दिवसांपूर्वी घडली आहे.या नंतर केडीएमसीने ही संपूर्ण इमारत रिकामी केली.या घटनेनंतर इमारतीमधील रहिवाशांनी आज गुरुवारी पायी चालत तिसगाव ते कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. या रहिवाशांनी केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेत पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.
कल्याण पूर्वेकडील चिकणी पाडा परिसरातील सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण जखमी तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर केडीएमसीने ही संपूर्ण इमारत रिकामी केली. केडीएमसीकडून या इमारतीमधील रहिवाशांचे कल्याण पूर्वेकडील शाळांमध्ये तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र या रहिवाशांनी आमचे पुनर्वसन करा अशी मागणी करत हातात सप्तशृंगीचे फलक घेत पायी चालत तिसगाव ते कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला.
दरम्यान मोर्चात सहभागी झालेल्या रहिवाशांनी आपल्या भावना व्यक्त केला. इतक्या वर्ष पहिले जमवून आम्ही संसार जमवला. दहा-पंधरा मिनिटात एवढा संसार कसा रिकामा करणार. निदान आम्हाला आमचा सामान काढण्यासाठी तरी वेळ द्या. आजचा तिसरा दिवस आहे. मात्र आम्ही बाहेर पडलो. आमची तात्पुरती व्यवस्था शाळेमध्ये केली आहे. मात्र शाळेत कधीपर्यंत राहणार? निदान पावसाळ्यापर्यंत आम्हाला तात्पुरती राहण्याची व्यवस्था करा अशी मागणी केली आहे.