DESK MARATHI NEWS.
डोंबिवली/प्रतिनिधी -जम्मू-काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला.यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेशहोता. पुण्यापाठोपाठ डोंबिवलीमधील ३ जणांचा मृत्यू झाला. हेमंत जोशी ,संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाला. अतिरेकी हल्ल्यातील पीडित कुटुंबियांची माजी खासदार राजन विचारेंनी घेतली भेट अतिशय वेदनादायक घटना घडली आहें. सरकारने स्व.संजय लेले यांच्या मुलाला सरकारी नोकरी दिली पाहिजे.देशावर आलेले हे संकट आहे.त्या तीन कुंटूंबाला मदत मिळायाला हवी. त्या दृष्टीकोनातून सर्वानी पाहिले पाहिजे.सरकार जी भूमिका घेईल त्याला आमचा पाठींबा आहे. असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विचारे यांनी शनिवार 26 तारखेला स्व. संजय लेले, स्व. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते राजन साळवी , उपनेते विजय साळवी, शिवसेना कल्याण लोकसभा जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे, कल्याण लोकसभा जिल्हा संगटक तात्या माने, शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे, युवासेना विधानसभा अदित्य पाटील, उपविधानसभा ऋतुनील पावसकर, शहर अधिकारी प्रसाद तुकृल,नितीन पवार,शाम चौगुले,प्रमोद कांबळी,अनिल मुठ्ठा,विलास म्हेत्रे,प्रियांका विचारे,सुप्रिया चव्हाण,सुरेखा सावंत,राजेंद्र सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.