महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम राजकीय

महाराष्ट्र निवडणुकीतील 76 लाख मतवाढ प्रकरणी विरोधकांनी सहभागी व्हा – प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना आवाहन

DESK MARATHI NEWS NETWORK.

पुणे/प्रतिनिधी –  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत संध्याकाळी 5 नंतर झालेल्या 76 लाख मतवाढीच्या प्रकरणात सर्व विरोधी पक्षांनी सुप्रीम कोर्टात ‘इंटरव्हिनर’ म्हणून उतरावे, असे आवाहन केले. विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यात सहभागी होऊन आपले मत मांडावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आंबेडकर म्हणाले की, आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार मतदानाची वेळ संपल्यानंतर झालेल्या 76 लाख मतांबाबत इलेक्शन कमिशनकडे कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नाही. “आयोग स्वतःच माहिती नसल्याचे सांगत असेल, तर ही निवडणूक प्रक्रियाच संशयास्पद ठरते. ‘फ्री अँड फेअर इलेक्शन’ हा संविधानाचा मूलभूत अधिकार असून, तो पाळला गेला नसेल तर निवडणुका रद्द करण्याशिवाय पर्याय नाही,” असे ते म्हणाले.

नोव्हेंबर 2025 मध्येच सर्व पक्षांना एकत्र न्यायालयीन लढाई लढण्याचे आवाहन पत्राद्वारे केले होते, असे आंबेडकरांनी सांगितले. “मुंबई हायकोर्टाने आमची याचिका फेटाळल्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टात अपील केले आहे. पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता असून, इतर पक्ष ‘पक्षकार’ म्हणून आले तर हा मुद्दा अधिक मजबूत होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधींनी कर्नाटकमधील एका मतदारसंघातील बोगस मतदारांचा खुलासा केल्याचे त्यांनी स्वागत केले. मात्र, “हा मुद्दा फक्त पत्रकार परिषदेत न मांडता सुप्रीम कोर्टातही मांडणे आवश्यक आहे. काँग्रेसकडे वकिलांची फौज आहे, त्यांनी या प्रकरणात हजर राहून युक्तिवाद करावा,” असे त्यांनी सुचवले.आंबेडकरांनी हेही नमूद केले की, इलेक्शन कमिशनने राहुल गांधी यांच्या प्रश्नांना प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर देण्यास सांगितले आहे. “राहुल गांधी यावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले.

सुब्रमण्यम स्वामी यांच्या खटल्याचा दाखला देत आंबेडकर म्हणाले की, व्हीव्हीपॅटद्वारे मतांची पडताळणी बंधनकारक आहे. जर ती होत नसेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी सर्व पक्षांनी एकत्रितपणे करावी.

“ही लढाई कोर्टाची आहे. जनजागृती महत्त्वाची असली तरी निर्णय फक्त न्यायालय घेऊ शकते,” असे आंबेडकरांनी ठामपणे सांगितले.

 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »