महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी देश

नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पंतप्रधान नागरी सेवा उत्कृष्टता पुरस्कार 2023 प्रदान

नवी दिल्ली/प्रतिनिधी नागरी सेवा दिनानिमित्त नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना ‘पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार 2023’ प्रदान करून सन्मानित  करण्यात आले. केंद्र सरकारच्या 12 प्रमुख योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासातील उल्लेखनीय योगदानासाठी शर्मा यांना हा पुरस्कार ‘जिल्ह्यांचा समग्र विकास’ श्रेणीत मिळाला.

17 व्या  नागरी सेवा दिनानिमित्त आज विज्ञान भवन येथे  केंद्रीय कार्मिकसार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अंतर्गत प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागा मार्फत या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्याने आयुष्मान भारतपंतप्रधान आवास योजनाजल जीवन मिशनउज्वला योजनामुद्रा योजनापोषण आहार योजनास्वनिधी योजना आणि पीएम विश्वकर्मा योजना यासह केंद्र सरकारच्या 12 प्रमुख योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीत राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला. केंद्र सरकारच्या सर्वेक्षणात नाशिकच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत शर्मा यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार 2023 मध्ये करंडकमानपत्र आणि 20 लाख रुपये प्रोत्साहन निधी असे पुरस्काराचे स्वरुप असून,  हा निधी नाशिक जिल्ह्यातील लोककल्याणकारी प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपयोगात आणण्यात येईल.

नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिव्हिल सर्व्हंट्सना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी सिव्हिल सेवेला समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन म्हणत कार्यक्षमतापारदर्शकता, EQ-TQ आणि नवोन्मेषाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘Nation First – Always First’ या मंत्रासह ‘विकसित भारत’च्या दिशेने मार्गदर्शन केले. यावेळी 2023-24 मधील उत्कृष्ट प्रशासकीय उपक्रम असलेल्या ई-बुक्सच्या मालिकेचेही अनावरण करण्यात आले.

या पुरस्कार वितरण समारंभात डॉ. जितेंद्र सिंग-केंद्रीय कार्मिकसार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री,  श्री.टी. व्ही. सोमनाथन-कॅबिनेट सचिव,  श्री. व्ही. श्रीनिवास- पंतप्रधानांचे प्रधान सचिव (पहिले) श्री. शशिकांत दास- पंतप्रधानांचे प्रधान सचिव (दुसरे),  वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व सनदी अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार 2023’ ने  (PM Excel Public Administration Award) सन्मानित झाल्यानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी श्री. जलज शर्मा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. या वेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या मा. उपसंचालक अमरज्योत कोर अरोरा यांनी श्री. शर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

नाशिक जिल्ह्याने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली समग्र विकासाच्या दिशेने उल्लेखनीय कामगिरी करत देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या आणि आदिवासीबहुल भागांचा समावेश असलेल्या नाशिक जिल्ह्याने पाण्याची टंचाईभौगोलिक विस्तार आणि इतर स्थानिक अडचणींवर मात करत केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली.

या यशाविषयी बोलताना जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, “हा पुरस्कार नाशिकच्या जनतेचा आणि प्रशासकीय यंत्रणेच्या सामूहिक प्रयत्नांचा सन्मान आहे. सॅचूरेशन अप्रोचचा अवलंब करत आम्ही प्रत्येक योजनेला गती दिली व नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला. हा पुरस्कार आम्हाला यापुढेही  अशी प्रेरणा देत राहील.

श्री. शर्मा यांनी केंद्र सरकारच्या योजनांना स्थानिक गरजांशी समन्वय साधून प्रभावीपणे राबवण्यावर भर दिला असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्र व राज्य शासनाचे आभार मानले. ते पुढे म्हणाले, “नाशिक जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यात आलेल्या योजनांत नागरिकांचा सक्रीय सहभाग आणि प्रशासनाची अथक मेहनत आहे. या पुरस्कारामुळे आम्हाला भविष्यातील कामासाठी अधिक ऊर्जा व प्रोत्साहन मिळेल. तसेचमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू’ या दृष्टिकोनानुसार राबवण्यात येणाऱ्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी जिल्हास्तरावर प्रभावीपणे करण्यात येईलअसा निर्धारही श्री. जलज शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »