महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

कल्याण परिमंडलात महावितरणचे वादळी वाऱ्यामुळे ९२ लाखांचे नुकसान

DESK MARATHI NEWS.

कल्याण/प्रतिनिधी – गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये वादळी वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका कल्याण परिमंडलातील वीज वितरण यंत्रणेला बसला आहे. या वादळामुळे २४१ विजेचे खांब, ५ रोहित्र व १८ किलोमीटर वीजवाहिन्या जमीनदोस्त होऊन जवळपास ९२ लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विपरित परिस्थितीतही युद्धस्तरावर दुरुस्तीचे काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

कल्याण मंडल एक कार्यालयांतर्गत डोंबिवली, कल्याण पूर्व आणि पश्चिम भागात एक खांब कोसळला असून चार ठिकाणी वृक्षांच्या फांद्या पडल्याने वीज वाहिन्यांचे नुकसान झाले. कल्याण मंडल दोन कार्यालयांतर्गत उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर, टिटवाळा तसेच ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उच्चदाबाचे ४ खांब व लघुदाब वाहिनीचे ६५ खांब कोसळले व ४ किलोमीटर वीजतारा तसेच १ रोहित्र कोसळण्यासोबतच ४ रोहित्र नादुरुस्त झाले होते.

वसई मंडल कार्यालयांतर्गत वसई, विरार, वाडा, नालासोपारा, आचोळे भागात उच्चदाब वाहिनीचे १४ खांब व लघुदाब वाहिनीचे २७ खांब तसेच एक रोहित्र जमिनदोस्त होण्यासोबतच दोन रोहित्र नादुरुस्त झाले. पालघर मंडल कार्यालयांतर्गत पालघर, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, बोईसर भागात उच्चदाब वाहिनीचे ५४ तर लघुदाब वाहिनीचे तब्बल ७६ खांब पडले. उच्चदाबाच्या ९.५ किलोमीटर वीजवाहिन्या आणि लघुदाबाच्या ७.६ किलोमीटर वीजवाहिन्या कोसळल्या. एकूण तीन रोहित्र जमिनदोस्त होण्यासह ५ रोहित्र नादुरुस्त झाले व ४ उपकेंद्रामंधील वीज वितरण उपकरणांत बिघाड झाला.

मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंते, सर्व कार्यकारी अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदाराचे कामगार फिल्डवर राहून अथक काम करीत होते. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही कमी कालावधीत वीजपुरवठा सुरळीत करणे शक्य झाले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »