महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजरूम

कल्याण नगर महामार्गावर दुरुस्तीसाठी लाखोंचा खर्च, तरी रस्त्याची झाली चाळण

DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – नुकत्याच सुरू झालेल्या पावसामुळे शहाड उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.वाहन चालक आणि प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.  विशेष म्हणजे या पुलाचे दुरुस्ती काम काही महिन्यापूर्वी कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ( पी.डब्ल्यू.डी.) करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष काम न करता केवळ कागदावरच दुरुस्ती दाखवून लाखो कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.ठेकेदाराने केलेली दुरुस्ती बघता रस्त्या खड्यात गेला आहे का असा सवाल उपस्थित होत आहे ,त्यामुळे रस्त्ये दुरुस्ती हे ठेकेदारांसाठी कुरन बनले आहे का? असाही सवाल नागरिकांच्या मनात येत आहे. 
शासनाच्या बांधकाम विभागाच्या नियमानुसार ठेकेदाराने केलेल्या कामाचे बिल मार्च अखेरीस मंजूर करून दिले जाते. मात्र काही दिवसाचा पाऊस पडताच  या पुलावर पुन्हा खड्डे पडले आहेत, हे पाहून ‘  पी.डब्ल्यू. डी.कल्याण व ठेकेदारांनी केवळ कागदावरच दुरुस्ती दाखवली का ?” असा सवाल सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. महामार्ग कल्याण ते आळेफाटा, नगर, बीड या मार्गावर असलेल्या या महत्त्वाच्या उड्डाण पुलावर रस्त्यांची  चाळण झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
अनेक वाहन चालक व प्रवाशी अपघाताचे बळी ठरत असून, संबंधित अधिकाऱ्याकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. शहाड उड्डाण पुलाचे दुरुस्ती काम झाल्यानंतर एवढ्या लवकर खड्डे पडणे म्हणजे स्पष्ट भ्रष्टाचाराचा प्रकार असल्याचा आरोप नागरिक करत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी सरकार कडे केली आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते या  प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आवाज उठवत असून ,सार्वजनिक बांधकामाचा निधीचा गैरवापर थांबवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »