महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजडेस्क

कल्याणच्या एसटी कर्मचाऱ्यांनी जपली माणुसकी; पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 50 कर्मचाऱ्यांनी दिले 1 दिवसाचे वेतन

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/प्रतिनिधी – बीड आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी- महापूरामुळे बळीराजा फार मोठ्या आस्मानी संकटात सापडला असून एसटीच्या कल्याण आगारातील 50 चालक-वाहक कर्मचारी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. या एसटी कर्मचाऱ्यांनी शेतकरी बांधवांप्रती माणुसकी जपत आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊ केला आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने बीड, धाराशिवसह राज्याच्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचे पिके, साठवलेले धान्य, जनावरे तसेच उपजीविकेच्या इतर वस्तू वाहून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या कठीणप्रसंगी एसटी कर्मचारीही आपल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसत आहे.

“लालपरी”ला भक्कमपणे उभे करण्यामागे गावोगावीच्या शेतकरी बांधवांचा मोलाचा वाटा असल्याची भावना व्यक्त करत कल्याण आगारातील चालक-वाहक कर्मचाऱ्यांनी आपल्या सप्टेंबर महिन्यातील (पेड इन ऑक्टोबर) एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्र कल्याण एसटी आगार व्यवस्थापक महेश भोये यांना देण्यात आले.

सेवा-शक्ती-संघर्ष एसटी कर्मचारी संघ, कल्याण आगार यांच्या माध्यमातून देण्यात येत असून संघाचे अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि मुख्य मार्गदर्शक विकी तरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुढाकार घेण्यात आला आहे. यावेळी विभागीय टीममधील सागर तुपलोंढे, संदेश पंडीतकर, आगार टीममधील आतिश बुचडे, निकेश तोडसाम, विवेक उईके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करताना “फुल नाही पण फुलाची पाकळी” म्हणून आमचे हे योगदान असल्याची भावनाही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »