महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम राजकीय

कल्याण शीळ मार्गावरील अर्धवट पुलाच्या निष्क्रिय कामाविरोधात उबाठा आणि मनसेचे आंदोलन  

DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण शील मार्गावरील आठ वर्षापासून अर्धवट आणि ठप्प  अवस्थेत असलेल्या पुलाच्या कामाविरोधात आणि सत्ताधाऱ्यांच्या खोट्या आश्वासनाविरोधात ३१ मे २०२५ रोजी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पलावा येथे निषेध आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार व कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.शिवसेना आणि मनसे बाँडिंग दिसून आले या समस्यावर दोन्ही पक्षांना एकत्रित आंदोलन केले .
डोंबिवली पूर्वेतील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. पुलाच्या अपूर्ण कामामुळे दररोज भीषण वाहतूक कोंडी निर्माण होत असून, स्थानिक नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा शाळांना सुट्टी द्यावी लागते अशी स्थानिकांनी सांगितले. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी पुलाचे उद्घाटन लवकर होईल अशी अनेकदा आश्वासन दिले, परंतु ती फोल ठरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.३१ मे २०२५ पर्यंत पूल पूर्ण होईल असे दिलेले आश्वासनही अपूर्णच राहिले. आंदोलनात मनसेचे माजी आमदार राजू (प्रमोद)  पाटील आणि मनसेचे स्थानिक पदाधिकारी देखील सहभागी झाले होते.
दोन्ही पक्षांनी मिळून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर  कठोर शब्दात टीका केली. ही लढाई कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसून, सामान्य जनतेच्या हक्कासाठी आहे, जनतेच्या प्रश्नासाठी शिवसेना (उबाठा) व मनसे एकत्र येण्यास सदैव तयार आहेत,”असे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »