DESK MARATHI NEWS,
भिवंडी/प्रतिनिधी – कल्याण मुरबाड रेल्वे मार्गातील अडचणी दूर करून हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर सुरू करण्यात यावा,या संदर्भात भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी संसदेच्या ३ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी केली होती.
खासदार सुरेश म्हात्रे यांच्या मागणीची दखल केंद्रीय रेल व खाद्य प्रसंस्करण उद्योग राज्य मंत्री रवनीत सिंह यांनी घेतली या रेल्वे प्रकल्पासाठी ८३६.१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून भूमी अधिग्रहण व इतर कामांना लवकरात लवकर प्रारंभ होणार असून या रेल्वे मार्गाचे काम मार्गी लागणार असल्याचे लेखी पत्र खासदार बाळ्या मामा यांना पाठवण्यात आले आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी आपल्या मागणीची दखल घेतल्याने कल्याण मुरबाड रेल्वेचा तिढा लवकरात लवकर सुटणार असून येथील नागरिकांच्या प्रवासातील अडचणी दूर होऊन मुरबाडचा विकास अधिक जलद गतीने होण्यास मदत होणार आहे अशी प्रतिक्रिया खासदार सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.