महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजडेस्क

कल्याण परिमंडलात महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी

DESK MARATHI NEWS.

कल्याण/प्रतिनिधी – जात, धर्म आणि पंथांच्या भेदातून मुक्त समानता व मानवी मुल्यांसाठीच सर्व महामानवांनी संघर्ष केला. सर्वच महामानवांच्या विचारांमागे मानवतेच्या हिताचा एक समान धागा आहे. या विचारांचा जागर करण्यासाठी महावितरणच्या कल्याण परिमंडलाकडून आयोजित करण्यात येत असलेला महामानवांच्या संयुक्त जंयती उत्सवाचा उपक्रम कौतुकास्पद व अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन लेखक व व्याख्याते बलभिम माथेले यांनी केले.

महावितरणच्या कल्याण परिमंडलाच्या वतीने कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी (२९ मे) सायंकाळी आयोजित महामानवांच्या संयुक्त जंयती उत्सवात ते बोलत होते. सलग चौथ्या वर्षी परिमंडलाकडून संयुक्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा होते. माथेले यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील वैचारीक नात्याची गुंफण उलगडून दाखवली. तसेच भगवान गौतम बुद्धांपासून संत परंपरेतील नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, रोहिदास, सेवालाल, गाडगेबाबा आदी संतांच्या विचारांमधील समतेच्या धाग्याची उकल त्यांनी केली. राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी, सावित्रीमाई फुले यांनी रुजविलेल्या जनकल्याणकारी मुल्यांचा जागर त्यांनी केला.

महामानवांच्या विचारांपासून कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने उपक्रमात सातत्य ठेवल्याचे मुख्य अभियंता मिश्रा यांनी स्पष्ट केले. यावेळी कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता अनिल थोरात, कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता विजय फुंदे, सहाय्यक महाव्यवस्थापक सुशिल पावसकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. अभियंते, अधिकारी, कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग गायके यांनी केले. तर औदुंबर कोकरे यांनी आभार मानले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »