DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी -कल्याण पूर्व पुणे लिंक रोडवरील विजयनगर जवळ रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा ढीग साचल्याने या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नियमित कचरा व्यवस्थापना अभावी कल्याण पूर्वेतील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग असल्याचे दिसून येत आहे मात्र या कचरा समस्ये कडे केडीएमसी प्रशासन दुलक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
त्याचा नाहक त्रास या भागात राहणार्या स्थानिक रहिवाश्याना, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना आणि विशेषतः शाळकरी मुले दुर्गंधीने त्रस्त आहेत. सहयोग सामाजिक कल्याण संस्थेचे प्रमुख विजय भोसले यांनी या संदर्भात तक्रार केली आणि सांगितले की, या कॅम्पसमध्ये नूतन हायस्कूल आणि सेंट ज्यूड्स या दोन शाळा आहेत आणि या शाळांमधील मुले मलेरिया आणि डेंग्यूसारख्या धोकादायक आजारांना बळी पडू शकतात.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच शहरात कचरा साफ करण्यासाठी ‘चेन्नई पॅटर्न’ लागू करण्याची घोषणा केली होती. ‘चेन्नई पॅटर्न’चे स्वप्न दाखवणारे केडीएमसी प्रशासन जर नियमितपणे कचरा गोळा करू शकत नसेल, तर ते चेन्नई पॅटर्न कसा राबवणार ? या शशांका व्यक्त केली आहे या कचऱ्याच्या ढीगाऱ्यांमुळे डास, माश्या आणि इतर प्रकारचे कीटक पसरले आहेत, त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. यामुळे पर्यावरण, हवा आणि पाणी दूषित होऊ शकते, ज्यामुळे शाळकरी मुले आणि रहिवासी आजारी पडू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे.