DESK MARATHI NEWS ONLINE.
कल्याण/प्रतिनिधी – जेलमधून सुटलेला आरोपीने व्यवसायासाठी पैसे हवे होते म्हणून वृद्धेची हत्या केल्याची घटना कल्याणजवळील आंबिवली परिसरात घडली आहे.आरोपीने पिण्यासाठी पाणी मागून महिलेच्या घरात प्रवेश केला होता. खडकापाडा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चांद उर्फ अकबर शेख (३०) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असून, तो यापूर्वीही हत्या प्रकरणात दोषी आढळून कारागृहात होता. चांगली वर्तणूक असल्यामुळे त्याला काही महिन्यांपूर्वी सुटका करण्यात आली होती. जेलमधून सुटल्यानंतर तो आंबिवलीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता. मात्र, मोमोज विक्रीसाठी व्यवसाय सुरू करायचा असल्याने पैशांची गरज होती.त्यामुळे त्याने काही दिवस कल्याणजवळील रंजना पाटकर यांच्या घराची रेकी केली. २० मार्च रोजी चांद याने पाणी मागण्याच्या बहाण्याने पाटकर यांच्या घरात प्रवेश केला. आरडाओरडा ऐकू येऊ नये म्हणून चांदने घरातील टीव्हीचा मोठा आवाज केला. चांदने पाटकर यांचा गळा दाबून हत्या केली.
चांदने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील कर्णफुले मिळून सुमारे एक लाखाचे दागिने घेऊन पसार झाला.
महिलेच्या हत्येप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी एक संशयितला ताब्यात घेऊन त्याला न्यायालयात हजर केले. सध्या तो कल्याण आधारवाडी जेलमध्ये आहे. मात्र, यादरम्यान पोलिसांनी परिसरात असलेल्या गुन्हेगारीवरती पाळण ठेवत अनेकांची माहिती घेतली. पोलीस तपासात पोलिसांनी चांदला अटक केली. चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी चांदकडून हस्तगत केला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.