महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image बिझनेस लोकप्रिय बातम्या

कल्याण मध्ये हॉटेलची वेळ वाढवून देण्याची हॉटेल व्यावसायिकांची मागणी,अन्यथा हॉटेल्स बंद ठेवण्याचा दिला इशारा

कल्याण/प्रतिनिधी – राज्य सरकारने कोवीडचे निर्बंध शिथिल केल्यानंतर व्यापारी आणि दुकानदारांनी आनंद व्यक्त केला असतानाच दुसरीकडे हॉटेल व्यावसायिक मात्र चांगलेच नाराज झाले आहेत. वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी आता कल्याणातील हॉटेल व्यावसायिकांनीही हॉटेल्स बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कल्याणातील हॉटेल व्यावसायिकांनी आज एक बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कल्याण हॉटेल ओनर्स असोसिएशनने ही माहिती दिली.

कोवीड रुग्णांची संख्या कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 2 दिवसांपूर्वी ठराविक जिल्ह्यातील कोवीड निर्बंध शिथिल केले. त्यामध्ये दुकाने उघडी ठेवण्याबाबतचे सर्व निर्बंध हटवत रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली. त्यामुळे गेल्या दिड वर्षांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या दुकानदार आणि व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे हॉटेल, रेस्टॉरंटचे निर्बंध तसेच कायम ठेवत दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयावर हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गेल्या दिड वर्षांपासून आम्हीही सर्व जण आर्थिक संकटात सापडलो आहोत. त्यामुळे आम्हालाही दुकानदारांप्रमाणे वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे.

कोवीड काळात राज्य सरकार असो की कल्याण डोंबिवली महापालिका दोघांनीही खूप चांगले काम केले आहे. त्याबद्दल कोणाचेही दुमत नाहीये. मात्र गेल्या दिड वर्षांत हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुकानदारांप्रमाणे सरकारने आमचाही विचार करावा. वेळ वाढवून न दिल्यास नाईलाजाने आम्हालाही इतर ठिकाणच्या हॉटेल व्यावसायिकांप्रमाणे हॉटेल बंद ठेवावी लागतील अशी माहिती कल्याण हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण शेट्टी यांनी दिली.
दरम्यान यावेळी झालेल्या बैठकीला कल्याण हॉटेल ओनर्स असोसिएशनचे सचिव राकेश शेट्टी, सदस्य शैलेश शेट्टी, बाळा शेट्टी, अमर घोलप, सुरेश शेट्टी यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »