DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाने थैमान घातले आहे.त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झालेले दिसत आहे. जोरदार पावसाचा मोठा फटका हा सर्वच स्तरावर बसल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. मुंबईतही रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी चाचल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहे. ठाणे जिल्ह्यालाही पावसाने चांगलेच जोडपले आहे. त्याचा परिणाम हा रस्ते वाहतुकीवर सुद्धा पाहायला मिळाला आहे, रायते पूल पाण्याखाली गेल्यामुळे कल्याण नगर मार्ग वाहतुकीसाठी काही वेळेसाठी बंद करण्यात आला होता. पावसाने 26 जुलैची आठवण 26 मे ला करून दिली असल्याचे दिसत आहे.
कल्याण नगर मार्गावरील मुरबाड रोड रायते येथील पुलाला उल्हास नदीचे पाणी लागण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव कल्याण-मुरबाड मार्ग बंद केला आहे. त्याचबरोबर प्रशासनाकडून नदीलगतच्या गावाना सतर्क इशारा देण्यात आला आहे. मुरबाड बदलापूर परिसरात मुसळधार पावसाने उल्हास नदी आणि गांधारी नदी दुथडी भरून वाहत आहे. पावसामुळे नदीने उग्ररूप धारण केलेले पाहायला मिळत आहे.
उल्हास नदी प्रवाह अचानक वाढल्याने चार म्हशी पाण्यात वाहून गेल्या त्याच बरोबर नदी किनाऱ्या वरील गावानं म्हारळ, कांबा,वरप ,रायते, मोहने गावातील ग्रामस्थान सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे .अद्याप पुलावरून पाणी गेले नसले तरी वाहतूक पूर्णपणे थांबवली असून वाहन चालकाला त्रास होऊ नये म्हणून ही वाहतूक टिटवाळा मार्गे वळवण्यात आली असल्याची कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांनी माहिती दिली आहे



