DESK MARATHI NEWS.
कल्याण/ संघर्ष गांगुर्डे – महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘शुन्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन राज्यभरात १ ते ६ जून दरम्यान वीज सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे. सप्ताहाच्या तिसऱ्या व चौथ्या दिवशी मंगळवार व बुधवारी (०४ जून) कल्याण परिमंडलात विविध ठिकाणी निबंध व चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून वीज सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली.
मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडलात सुरक्षा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होत असून अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत विविध माध्यमातून वीज सुरक्षेचा जागर करण्यात येत आहे. अधीक्षक अभियंता अनिल थोरात यांच्या उपस्थितीत कल्याण मंडल एक अंतर्गत कल्याण पूर्व व पश्चिम तसेच डोंबिवली विभागात विविध ठिकाणी निबंध आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तर उंबर्डे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना तर तेजश्री इमारतीतील प्रशिक्षण केंद्रात कर्मचारी व पाल्यांना वीज सुरक्षेचे धडे देण्यात आले.
अधीक्षक अभियंता विजय फुंदे यांच्या उपस्थितीत कल्याण मंडल दोन अंतर्गत उल्हासनगर एक आणि दोन, बदलापूर, कल्याण ग्रामीण विभागात महावितरण कर्मचारी व पाल्य तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी वीज सुरक्षेबाबत चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. तर अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वसई मंडलातील वसई व विरार विभागात तसेच पालघर मंडलात विविध ठिकाणी तसेच शाळांमध्ये चित्रकला व निबंध स्पर्धांच्या माध्यमातून वीज सुरक्षेचा जागर करण्यात आला.
वसुंधरा दिनानिमित्त गुरुवारी (०५ जून) परिमंडलातील सर्वच दहा विभाग कार्यालय स्तरावर वीज सुरक्षा व बचत विषयी रॅली काढण्यात येणार आहे. तर ६ जून रोजी सकाळी परिमंडलातील सर्व शाखा कार्यालयातील जनमित्र वीज सुरक्षेबाबत प्रतिज्ञा घेणार आहेत. याच दिवशी महावितरणचा २०वा वर्धापन दिन सर्व कार्यालयांमध्ये उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.