महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
लोकल बातम्या

कल्याणात अर्जुनजी डोमाडे यांचा पोलीस पदोन्नती आणि सामाजिक चळवळीतील योगदानाबद्दल सन्मान

DESK MARATHI NEWS.

कल्याण/ संघर्ष गांगुर्डे – एक सामान्य शेतकरी कुटुंब, वडील माथाडी कामगार, आणि आई भाजी विक्रेती या घरात जन्मलेला मुलगा, ज्याला म्हणतात ना ,आवड असली की सवड मिळते या उक्तीप्रमाणे पोलीस खात्यातील अतिशय दगदगीची आणि प्रचंड कामाचा व्याप असलेली नोकरी करून, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळून, सर्व सामाजिक बांधिलकी आणि उपक्रमांमध्ये भाग घेऊन, त्याचप्रमाणे आपली साहित्याची आवड अतिशय उत्कृष्टपणे पूर्ण करून, हा अवलिया कायम चेहऱ्यावर स्मितहास्य आणि संयम असलेला . लहानपणापासूनच मित्र परिवारा बरोबर समाजसेवेचे बाळकडू घेऊन जन्माला आलेले अर्जुनजी यांचे बालपण आणि शिक्षण अतिशय गरिबी आणि खडतर गेले,परंतु याचा कोणताही बाहू न करता त्यांनी कल्याण या आपल्या कर्मभूमीमध्ये पोलीस खात्यातील सेवा अतिशय प्रामाणिक पणे पार पाडत आहे, त्याचबरोबर अनेकविध संस्थाचे ते संस्थापक आहेत, कल्याण सिटीझन फोरम, मानव सेवा संघ, खंडेराव सेवा समिती, पु .ल. कट्टा ,अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती, कल्याणातील साहित्य चळवळ, अशा एक ना विविध संस्थांचे ते संस्थापक सदस्य आणि त्या संस्था नावारुपाला आणण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.

या कार्यामध्ये त्यांच्या मागे त्यांचे बंधुतुल्य मित्र किशोरदादा खराटे यांचा मोलाचा वाटा आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या धर्मपत्नी अश्विनीजी वहिनी यांची त्यांना मोलाची साथ आहे.कल्याणात अर्जुनजी डोमाडे यांचे पोलीस पदोन्नती आणि सामाजिक चळवळीतील योगदानाबद्दल सन्मान आणि अभिनंदन पर सोहळ्यामध्ये रवींद्र लाखेजी बोलत होते,कल्याण सिटीझन फोरमच्या वतीने आयोजित केलेला एक भव्य गौरव सोहळा कल्याण येथील सोनवणे कॉलेज मध्ये संपन्न झाला.

अगरवाल कॉलेजचे अध्यक्ष विजयजी पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सादभाई काझी साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोदजी हिंदुराव, माजी आमदार नरेंद्रजी पवार, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक  शंकरावजी आव्हाड, प्रसिद्ध कवी आणि लेखक अरुणजी म्हात्रे, सौ. रेखा मेड मॅडम, अनिलजी पंडित , लेखक आणि कवी रवींद्रजी लाखे, प्रसिद्ध अभिनेते , लेखक आणि दिग्दर्शक राम दौंड, अनंतजी गवळी साहेब, कार्यक्रमास उपस्थित उपस्थित होते.कार्यक्रमास वरील सर्व संस्थांचे पदाधिकारी, हितचिंतक, मित्रपरिवार आणि आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते .सर्व वक्त्यांनी डोमाडे साहेबांच्या कार्याचा गेल्या पन्नास वर्षाचा आढावा, आणि कौतुक केले.
डोमाडे साहेबांनी त्यांच्या उर्वरित सेवा काळामध्ये अतिशय सचोटीने सेवा करण्यासाठी, तसेच पुढील भावी आयुष्यासाठी असलेली त्यांची सामाजिक बांधिलकी त्यासाठी असलेली त्यांची तळमळ आणि धडाडी, त्यांच्यातील असलेल्या लेखक आणि कवी याला वाव द्यावा. उत्तरोत्तर अशीच समाजसेवा , लेखन आणि कविता त्यांच्या हातून घडो ह्या शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता अनंत गवळी, साद भाई काझी, प्रशांत तोष्णीवाल  संजय वाजपेयी, वसंत आव्हाड , दामोदर काबरा , दत्ता केंबुळकर , सुनील डोके इत्यादींनी परिश्रम घेतले, त्याचप्रमाणे कल्याण सिटीजन फोरमचे सर्व पदाधिकारी आणि मित्रपरिवार या सर्वांनी मदत केली . 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »