महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी महत्वाच्या बातम्या

पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे कारागृहातील कैदी चिंतेत

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

अमरावती/प्रतिनिधी हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अमरावतीत काल रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने बॅटिंग केली आहे. गारपीट, पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अमरावती जिल्ह्यात संत्रा बागांसह भाजीपाला व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाकडून या नैसर्गिक आपत्तीची तत्काळ दखल घेत करण्यात आलेल्या प्राथमिक सर्व्हेक्षणात १२ हजार २७८ हेक्‍टरवरील पिकांना फटका बसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अवकळी पावसामुळे शेतातील गहू, ज्वारी, संत्रा, लिंबू, कांदा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. दोन दिवसांपूर्वी सलग तीन दिवस अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले होते. मात्र, काल रात्री आलेल्या अवकाळी पावसाने अमरावती मध्यवर्ती कारागृहातील वांगी, टोमॅटो, कांदा, पाकलभाजी, घोळभाजी, लिंबू, दोडके यांसह अन्य भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. कारागृहातील कैद्यांना खुल्या बाजारातील कांदा खाण्याची वेळ येणार आहे.

अमरावती मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांचे भोजन तयार करण्यासाठी आधी दर दिवसाला भाजीपाला खरेदी करावा लागत होता. पण गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अमरावती मध्यवर्ती कारागृहात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे. कारागृहातील कैद्यांनी फार मेहनतीने शिवार फुलवले. यातूनच मिळलेल्या उत्पन्नातून कैदी आपल्या कुटुंबाल पैसे पाठवत असे. पण अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

Related Posts
Translate »