महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र मुख्य बातम्या

संजय राऊत यांचे मानसिक संतुलन दिवसेंदिवस बिघडत आहे-श्रीकांत शिंदे

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

ठाणे/प्रतिनिधी – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या नावाखाली ५०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप त्यांनी केले तसेच श्रीकांत शिंदे यांची चौकशी करा अशी मागणीही संजय राऊत यांनी केली होती. त्यावर आता डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांचे मानसिक संतुलन दिवसेंदिवस बिघडत चालले आहे, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केली.

ठाण्यात पत्रकारांशी बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले “ज्या प्रकारे संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे ते खूप हास्यास्पद आहे. जे पत्राचाळच्या घोटाळ्यात जेलमध्ये गेले ते पत्र लिहित आहेत. फाउंडेशनच्या माध्यमातून जी चांगली कामे होत आहेत ते पत्रामधून लिहिण्याचे काम त्यांनी केले आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे, यावरुन त्यांचा नरेंद्र मोदींवरील विश्वास वाढल्याचे दिसते आहे. ज्यांनी खिचडीमध्ये घोटाळा केला, जे पत्राचाळमध्ये जेलमध्ये गेले. खिचडी घोट्याळ्याचे ज्यांचा कुटुंबातील लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत त्यातून त्यांनी कोणाला मदत केली आहे का ? जे पत्र्याच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्यांना पत्र लिहू नये. महाराष्ट्र व देश बघतो आहे की संजय राऊत यांचे मानसिक संतुलन दिवसेंदिवस बिघडत आहे त्यांनी चांगले हॉस्पिटल बघून उपचार करुन घ्यावेत.” अशी टीका खासदार श्रीकांत शिंदेंनी संजय राऊत यांच्यावर केली.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच नेते मंडळी विरोधी पक्षाने केलेल्या घोटाळ्यांची यादी जनतेला वाचून दाखवतात. पण पुढे निवडणुका संपल्या की घोटाळा ,घोटाळा करणाराआणि घोटाळ्याचे आरोप करणारा हे सगळे गायब होतात. मग सामान्य जनतेच्या मनात हा विचार येतो की नक्की विश्वास कुणावर ठेवायचा,आणि का ?

Related Posts
Translate »