महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
मुंबई लोकप्रिय बातम्या

मुंबईत नवीन वर्षात राजकीय भस्मासुराचे होणार दहन

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – सध्या राजकारणात बरेच दावे-प्रतिदावे, आरोप- प्रत्यारोप सुरू असून या राजकारणाला सर्वसामान्य जनता वैतागली आहे, असा संदेश देणारा पुतळा वरळी येथील एका सोसायटीत साकारण्यात आला आहे. या राजकीय भस्मासुर पुतळ्याचे नवीन वर्षात दहन करण्यात येणार आहे. गेले ३० वर्षापासून सामाजिक विषय हाताळणाऱ्या वरळी येथील गोपचार सोसायटीबाहेर राजकीय भस्मासुराचा मोठा पुतळा साकारण्यात आला असून याबाबत नागरिकांनी अभिप्राय लिहिण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बदलत्या राजकारणाचे समीकरण नेमके काय आहे यावर जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होऊन राजकारण योग्य की अयोग्य, असा प्रश्न पडला आहे. त्याबद्दल नागरिकांनी आपला अभिप्राय नोंदवावा, यासाठी फलक देखील लावण्यात आले आहे. सध्याचे राजकारण हे सर्वच पक्ष आपापल्या सोयीनुसार करीत आहेत. वरळीच्या एका सोसायटीकडून मोठे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले असून त्यात सर्व सामान्य जनतेला पडलेला प्रश्न राजकारण योग्य कि अयोग्य यावर जनतेचे मनोगत, मत याच फ्लेक्सवर थोडक्यात लिहायचे असल्यामुळे आपली राजकारण्यांविषयी भावना व्यक्त करण्याची संधी नागरिकांना मिळत आहे.

शेतकऱ्याला आपला माल रस्त्यावर फेकावा लागत आहे. लोकशाहीची हत्या ,लोकशाही टिकवावी लागेल. सरकार आणि राजकीय नेते यांच्या दुष्ट चक्रात सामान्य माणूस पिचला जातोय. देशाची लोकशाही धोक्यात आहे. अस्मानी संकटात देशाचे अन्नदाता (शेतकरी) उध्वस्त होतोय. एकीकडे लोकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळत नाहीत. बेरोजगारीचा प्रश्न समोर उभा आहे. एकीकडे राजकीय लोकं आपापल्या पद, पैसा, सत्ता आणि प्रतिष्ठा यात आपले सुख पहात आहेत तर दुसरीकडे सामान्य जनता महागाईने होरपळली जातेय. या पुतळ्याचे ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता दहन करण्यात येणार आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »