DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक पदाची निवडणूक २९ जून रोजी होणार असुन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १५४ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले होते. सोमवार २ जून रोजी छाननी अंती १४ अर्ज बाद झाल्याने १४० उमेदवार निवडणूक रिगंणात राहीले आहेत.अर्ज मागे घेण्याच्या ३ जून ते १७ जून पर्यंत कालावधीत किती उमेदवार अर्ज मागे घेतात. त्यानंतरच निवडणूक रिंगणात किती उमेदवार असतील हे चित्र स्पष्ट होईल.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदाच्या एकूण १८ जागा असुन त्या मध्ये शेतकरी सेवा सोसायटी मतदार संघ ११ जागा, ग्रामपंचायत मतदार संघ ४ जागा, व्यापारी २, हमाल माथाडी १ जागा हे मतदार संघ आहेत. तर १८ जुन रोजी उमेदवारांना निशाणी वाटप व २९ जुन रोजी मतदान व त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध असलेली कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. बाजार समितीवर महायुती कि महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार हे लवकरच समजेल. संचालक पदाच्या निवडणूक साठी राजकीय क्षेत्रातील मान्यवर, तसेच माजी संचालक निवडणूक रिंगणात उमेदवार म्हणून उतरले असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत राजकीय पक्षासह, सर्वसामान्य वर्गाचे लक्ष लागल्याचे चित्र दिसत आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी डीडीआर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, १५४ अर्ज दाखल करण्यात आले होते. छाननी अंती १४ अर्ज बाद झाले असून उद्या यासंदर्भात उमेदवार यादी लावणार आहोत.