महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य न्युजडेस्क

कल्याणात उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू,पालिका रुग्णालयाच्या हलगर्जी पणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

DESK MARATHI NEWS ONLINE.
कल्याण/प्रतिनिधी – पुण्यात मंगेशकर हॉस्पिटल मध्ये प्रसूती दरम्यान महिलेला दाखल करून न घेतल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पुनः एकदा रुग्णालयाच्या हलगर्जी पणा मुळे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण मध्ये घडली आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या कल्याण पूर्वेतील शक्तीधाम रुग्णालयात कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशन साठी दाखल करण्यात आलेल्या एका तीस वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना  सोमवारी  दुपारच्या सुमारास घडली.या घटनेमुळे पालिकेच्या आरोग्य विभागातील हलगर्जी पणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मयत महिलेचे नाव शांती देवी  मौर्या (३०)असे आहे.
कल्याण पूर्वेतील खडेगोलवली परिसरात राहणारी महिला शांती देवी मौर्या(३०) ही गेल्या चार दिवसापूर्वी म्हणजेच शुक्रवारी पासून तिच्या पोटात दुखत असल्याने तिला नजीकच्या कोळसेवाडी परिसरातील पालिकेच्या शक्तीधाम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या महिलेची रुग्णालयात दाखल केल्या पासून प्रकृती खराब असलेल्याने तिच्या शरीरात रक्त चढविण्यात आले  होते .तीन मुल असल्याने पुन्हा ती गर्भवती राहिल्याने गर्भपात करून कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशन करण्यासाठी तिची सोमवारी प्रकृती सुधारल्याने गर्भपात व कुटुंब नियोजन ऑपरेशन करण्यासाठी ओटी मध्घे घेऊन  उपचार सुरू असताना अचानक पणे तिची  प्रकृती खालावल्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी कुटुंबीयांना पालिकेच्या हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी सांगितले असता तिच्या नजीकच्या खाजगी रुग्णालय अमेय हॉस्पिटल मध्ये रुग्णवाहिके मधून दाखल करण्यासाठी नेत असताना खाजगी रुग्णालयात दाखल करण्या पूर्वी तिचा मृत्यू झाल्याची खळबळ जनक घटना घडल्याने पालिकेच्या आरोग्य विभागातील हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.
या घटने प्रकरणी मयत महिले पती अखिलेश मौर्या यांनी सांगितले की माझी पत्नी शांती देवी  हिला मुतखड्याचा त्रास असल्याने तिच्या पोटात सारखे दुखत असे त्यातच पालिकेच्या आरोग्य विभागातील आशा सेविका आमच्या परिसरात सर्वे साठी आल्या असता त्यांना माझ्या पत्नीने पोटात दुखत असल्याचे सांगितल्याने त्यांनी मूतखड्याच्या आजारावर उपचारासाठी दाखल केले असता शांती देवी  गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. पहिले तीन मुल असताना गर्भ पात करून कुटुंबनियोजनाचे ऑपरेशन करण्याचे ठरले असता तिचे सोमवारी ऑपरेशन करण्यासाठी ऑपरेशन थिएटर मध्ये नेले असता तिच्या वर उपचारा पूर्वी प्रकृती खालावल्याने तिला दुसऱ्या खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यासाठी आम्हाला सांगितले नजीकच्या खाजगी रुग्णालय अमेय हॉस्पिटल मध्ये रुग्णवाहिके मधून दाखल करण्यासाठी नेत असताना खाजगी रुग्णालयात दाखल करण्या पूर्वी तिचा मृत्यू झाला हा मृत्यू पालिकेच्या हलगर्जी पणा मुळे झाल्याचाआरोप मयत महिलेचा पती अखिलेश व त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »