महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

कल्याणातील आधारवाडी कारागृहात कैदी महिलेची आत्महत्या

कल्याण प्रतिनिधी-कल्याण मधील आधारवाडी जेलमध्ये मुलाच्या हत्येप्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या महिलेने, जेलच्या शौचालयात सोमवारी दुपारच्या सुमारास साडीच्या साह्याने गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. मायाबाई रामदास आगळे (५२) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने जेल परिसरात खळबळ माजली आहे .
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी कारागृहात मुलाच्या हत्याची शिक्षा भोगत असणाऱ्या आरोपी महिलेने गळफास घेऊन जीवन संपवले आहे या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे   मायाबाई ही ठाणे येथील चिराग नगर येथे कुटूंबासह राहत होती. तीला शिवाजी रामदास आगळे (वय २५) व सतीश रामदास आगळे (वय २४) अशी दोन मुले होती. त्यापैकी शिवाजी हा एका डेअरीमध्ये काम करत होता. तर सतीश हा बेरोजगार होता. मायाबाई दुसऱ्यांच्या घरातील छोटी-मोठी कामे करून कुटुंबाचा उदर्निवाह करत होती. मात्र तिचा लहान मुलगा सतीश हा दारू पिऊन घरात सतत त्रास द्यायचा, पैशांची मागणी करायचा. त्यामुळे सतीशच्या सततच्या त्रासाला कंटाळून मायाबाईने अखेर आपला मोठा मुलगा आणि दुरच्या एका नातेवाईकाच्या मदतीने सतीशची ७ जानेवारीला हत्या केली. व पुरावा नष्ट करण्यासाठी तिने सतीशचा मृतदेह कसारा घाटात फेकला, मात्र पोलिसांनी अवघ्या ४ तासांमध्ये या हत्येचा शोध लावला होता.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »