महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे व्हिडिओ

स्मार्ट सिटीची मैदाने स्मार्ट कधी होणार ? कल्याणचे वैभव असलेल्या सुभाष मैदानाची दुरवस्था

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगरपालिका असख्य प्रश्नांनी वेढलेली महानगर पालिका असे चित्र दिवसदिवस बनत चाललेले आपल्याला पाहायला मिळते. खराब रस्ते ,वाहतूक संमस्या,पाण्याचे प्रश्न, अनधिकृत बांधकामे अशा कोणत्याना कोणत्या कारणाने महापलिका नेहमीच चर्चेत असते. मागील काही दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री यांनीही रस्त्यावरून प्रशासनाला खडे बोल सुनावले होते. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांना सुद्धा धक्का बसला होता कि कल्याण डोंबिवली हे स्मार्ट सिटी आहे म्हणून. मंत्री अनुराग ठाकूर हे केंद्रीय क्रीडा मंत्री देखील आहेत शहराचे नशिब त्यांनी इथल्या मैदानांची पाहणी केली नाही नाहीतर त्यांना आणखीन एक मोठा धक्का बसल्या शिवाय राहिला नसता.

केडीएमसी मुख्यालयाच्या लगद असलेल्या कल्याणचे वैभव असलेल्या सुभाष मैदानाची दयनीय अवस्था बघून क्रीडाप्रेमी नागरीकांमध्ये कमालीची नाराजी आहे. कल्याण मधील सर्व मैदानात सर्वात जूने अस मैदान असेल तर ते सुभाष मैदान. या मैदानात अनेक सभा गाजल्या आहेत. त्याच प्रमाणे या मैदानात नावाजलेल्या खेळाडूंनी येथेच प्रशिक्षण घेऊन सराव केला आहे. जर अशीच दुरवस्था या मैदानाची राहिली तर नवीन खेळाडूं कसे तयार होणार आणि त्या खेळाडूंकडून आपण काय अपेक्षा बाळगणार.असा सवाल नागरिकाचा आहे.

सुभाष मैदानात लहान मुलांपासून तर वयोवृद्ध नागरीकांपर्येंत सर्वच नागरिक येतात काही मोर्निंग वॅाकसाठी, काही खेळाचा सराव करण्यासाठी तर काही तरुण पोलिस भरतीला लागणाऱ्या सरावासाठी येतात.त्यात तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात येतात.पण या नावाजलेल्या मैदानात साधी स्वच्छातागृहाची सोय नसल्याने तरुणी महिला वर्गाची मोठी गैरसोय होताना दिसुन येत आहे. यामुळे येथे येणाऱ्या महिला वर्गाने कमालीची नाराजी वक्त केली आहे. मैदानाला लागून असलेल्या उद्यानात असलेल्या स्वच्छातागृहाचीही अवस्था देखील दयनीय आहे. स्वच्छातागृहाचीही सोय नसल्यामुळे येथे तुरुणी इच्छा असतानाही येथे क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यासाठी येत नसल्याचे येथील क्रिकेट प्रशिक्षकांनी सांगितले आहे. म्हणजेच जर महिला जागतिक क्रिकेट मध्ये आपल्या देशाचे नाव गाजवत जरी असल्या तरी कल्याणच्या मैदानात स्वच्छातागृह नसल्यामुळे तरुणींना क्रिकेटचे प्रशिक्षण घेता येत नाही ही फार खेदाची बाब आहे.

त्याच बरोबर इतर शहरातील मैदानातील पावसाळ्या नंतरचे गवत काढून खेळ सरावाला सुरवात झाली आहे पण सुभाष मैदानात गवत मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे खेलाडूंना सरावही करता येत नाही असेही त्यांनी सांगितले.

या मैदानातील बैठक गॅलेरी अवस्था भयंकर आहे येथे मोठे कचर्याचे साम्राज्य पसरलेले आपल्याला पाहायला मिळेल. थोडक्यात सांगायचे झाल्यास संपूर्ण मैदानाची दुरवस्था झाल्याची आपणास पहावयाला मिळते . यामुळे क्रीडाप्रेमी नागरिकांच्या मनात कमालीची नाराजी आहे पालिका प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष घालून सुभाष मैदानाची झालेली दुरवस्था लवकरात लवकर दूर करावी अशी विनंती सर्व नागरीकांनीनी महानगरपालिकेला केली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »