नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
छ.संभाजीनगर/प्रतिनिधी – राज्यातील लोकसभा निवडणुका पार पडल्या असून सर्वांनाच आता वेध लागले आहेत ते या निवडणुकीच्या निकालाचे. पण अशातच मराठा आंदोलनाला ज्वलंत ठेवणाऱ्या जरांगे पाटलांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण 6 जून पर्यंत सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलन खूप मोठं होईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. यावेळी त्यांनी छ.संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधला. “21 ते 24 तारीखेपर्यंत माझ्या दौरा आहे. त्यामुळे मी रुग्णालयातून सुट्टी घेतलेली आहे आणि चार जूनला आंतरवाली सराटी मध्ये आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही.”असे जरांगे पाटील म्हणाले.
देशात एकीकडे लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. तर दुसरीकडे याच निकालाच्या दिवशी मनोज जरांगे पाटलांनी अंतरावली सराटीमध्ये आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. “4 जूनला अंतरावली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे. आम्हाला लोकसभेच्या गुलालात पळायचं नसून आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालात पडायचं आहे. मराठा समजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही अंतरवालीत एकवठणार आहोत.” तसेच “मराठा आणि कुणबी एकच आहेत. सगे सोयऱ्याची अंमलबजावणी करावी, हैदराबादचा गॅझेट लागू करावा याच आमच्या प्रमुख मागणी आहे. ठरल्याप्रमाणे आम्हाला 6 जून पर्यंत आरक्षण द्यावे अन्यथा हे आंदोलन खूप मोठे होईल.”असे आव्हान जरांगे पाटील यांनी सरकारला केले आहे.