महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

ठाणे जिल्हातील विकासाच्या दृष्टीने सरकारकडे राष्ट्रवादीच्या विविध मागण्या

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – ठाणे जिल्हातील विकासाच्या दृष्टीने राज्य शासनाशी संलग्न विविध प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी केली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विविध विकास कामांना न्याय देण्यासाठी लवकरात लवकर राज्य शासनाने मान्यता द्यावी अशी मागणी देखील हिंदुराव यांनी केली आहे.

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला प्रमोद हिदुराव यांच्यासहप्रसाद महाजन, प्रदेश सचिव, रमेश हनुमंते प्रदेश सरचिटणीस भरत गोंधळी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, प्रविण खरात प्रदेश चिटणीस दिनेश पटेल व्यापारी सेल शहर सचिव, प्रसाद सदलगे जिल्हा उपाध्यक्ष, रेखा सोनावणे – जिल्हा उपाध्यक्ष, सुरय्या पटेल जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक अय्याज मौलवी उपस्थित होते.

जवळपास अडीच वर्षे चाललेले राज्यातील हे महविकास आघाडी सरकार एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडानंतर उलथवून टाकले. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने ठाणे जिल्ह्याला प्रथमच मुख्यमंत्रीपदाचा बहुमान प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून ठाणे जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावणाऱ्या आणि इथल्या ग्रामीण भागाला मुख्य प्रवाहाशी जोडणाऱ्या योजनांना गती देण्याची आग्रही मागणी केल्याचे हिंदुराव यांनी सांगितले.
यामध्ये प्रामुख्याने एम एम आर डी एच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे. जेणेकरून पायाभूत सुविधा, रस्ते, ड्रेनेज,सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, दळण वळण,पाणी पुरवठा आदी महत्वाच्या बाबींचा जलद विकास करणे सोपे जाईल. तसेच कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रस्तावित केलेला 400 कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, कल्याण आणि मुरबाड तालुक्यात महिलांसाठी इंडस्ट्रीयल इस्टेट सुरू करावी.

त्याच प्रमाणे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आरक्षित जागेवर प्रस्तावित शासकीय रुग्णालयाला मान्यता द्यावी, बेस्टच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यासाठी एकच वाहतूक प्राधिकरण स्थापन करावे, मेट्रो रेल्वेचा कल्याणपुढील उल्हासनगर, अंबरनाथ, टिटवाळा, बदलापूर आणि मुरबाडपर्यंत विस्तार करावा अशी मागणी आपण यावेळी केल्याचे प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याच्या सर्व प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्याकडून या गोष्टींना प्राधान्य देऊन त्यादृष्टीने अंमलबजावणी सुरू होईल असा विश्वासही हिंदुराव यांनी व्यक्त केला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »