महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याच्या मागणीसंदर्भात वंचितचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नेशन न्यूज मराठी टीम.

औरंगाबाद / प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पश्चिम तालुक्याच्यावतीने या घटनेचा निषेध व्यक्त करून जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना पक्षाच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील उच्चवर्णीय मराठा समाजातील काही लोकांनी एकत्र येत माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली असून, या गावातील बौद्ध तरूणांना झाडाला उलटे टांगून बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर स्वतः थुंकले लघवी केली आणि ती त्या बौद्ध तरुणांना चाटायला लावली.

पुरोगामी महाराष्ट्रात अश्या घटना वारंवार घडत असुन राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे कायद्यांचा धाक उरलेला नाही. त्यामुळे नाना गलांडे , युवराज गलांडे यांच्यासारखे लोक कायदा हातात घेऊन बौद्ध समाजावर अत्याचार करत आहे, अशा या घटनेवरून या लोकांना राजकीय आश्रय असल्याचे दिसून येते. त्यामुळे या प्रकरणाची पोलिसांनी निःपक्षपणे चौकशी करावी व सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, सदरील घटना फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पिडीत कुटुंबाला न्याय मिळवुन द्यावा. नसता वंचित बहुजन आघाडीच्यावतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करेल याची सर्व ती जबाबदारी राहील असेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, तालुकाध्यक्ष अंजन साळवे, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर तायडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य पी के दाभाडे, सतीष महापूरे ता उपाध्यक्ष,ज्ञानशील वाघमारे ता सदस्य, अशोक त्रिभुवन ता संघटक,धिरज खैरे , सुगंध दाभाडे कोषाध्यक्ष, जेष्ठ नेते जी डी खंडागळे, जेष्ठ नेते पंडितराव तुपे, रवि रत्नपारखे आदी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »