महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

खतांच्या गोदामांचा ताबा घेण्याचा वंचितचा सरकारला इशारा

नेशन न्यूज़ मराठी टिम.

अकोला/प्रतिनिधी – शेतीसाठी आवश्यक असलेल्या खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करुन ती खते चढ्या भावाने विकल्या जात असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी ह्या शेतकऱ्यांनी वंचित बहुजन युवा आघाडीकडे केल्या हाेत्या. या तक्रारींनुसार प्रशासनाने शेतक-यांना खतांची उपलब्धतता करुन द्यावी, अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडी गाेदामाचा ताबा घेईल, असा इशारा कृषी विभागास दिला.

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्यासह वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते यांनी अकोला जिल्हा कृषी अधिकारी किरवे यांची भेट घेतली. “अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन व प्रशासनाला अजुन जाग आली नाही का…? की फक्त खोटी आश्वासने ह्या त्रिकुट सरकार देत आहे असा सवाल विचारला.

शेतकऱ्यांच्या नुकसान संदर्भात माहिती दिली असतांनाच त्यात शेतीसाठी आवश्यक असलेल्या खंताची मोठ्या प्रमाणात गोडाऊनमध्ये माल साठवून कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. या टंचाईचा फायदा घेत अनेक कृषी सेवा केंद्रवाल्यांनी खतांची चढ्या भावाने विक्री करुन हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या खिश्यावर दरोडा टाकल्यासारखा प्रकार करत आहे. हा प्रकार आपण आपल्या स्तरावरून आदेशित करुन तात्काळ थांबवावा व साठवणुक केलेल्या खताला शेतकऱ्यांना शासकीय किमतीत उपलब्ध करून देण्यात यावा अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी हे गोडाऊनवर ताबा करून शेतकऱ्यांना स्वतः खते वाटप करेल असा अल्टिमेटम जिल्हा कृषी अधिकारी किरवे यांना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »